शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

जेएनपीए बंदर परिसरात रासायनिक टँकरच्या साफसफाईचा उरणच्या पर्यावरणाला धोका

By नारायण जाधव | Updated: June 18, 2024 16:57 IST

रसायनमिश्रित पाण्याने काही ठिकाणी मासे मृत्यू पावतात तर काही ठिकाणी माती प्रदूषित होते

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील जेएनपीए बंदर परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचे टँकर धुण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणाला हानीकारक असलेल्या या कृत्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांनी टँकर धुतल्यानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे कुठे मासे मरत असल्याची तर कुठे माती प्रदूषित होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जेएनपीए कंटेनर फ्रेट स्टेशनजवळील सोनारी येथील अशाच एका सेवा केंद्रात दररोज किमान १० टँकर स्वच्छ केले जातात, असे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेएनपीए परिसरात अशी अनेक टँकर सेवा केंद्रे आहेत जिथून घातक रसायनांचे टँकर धुतले जात असून त्या माध्यमातून घातक रसायने थेट खाडीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मारले जात असल्याचे ते म्हणाले.

दोषींवर कारवाई हवी

रसायनांचे टँकर धुण्याचे प्रकार नियमित अंतराने घडत असून याचा परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होतो, असे हितेश कोळी, अध्यक्ष - गव्हाण कोळीवाडा, फिशिंग सोसायटी यांनी सांगितले. यामुळे यातील दोषींवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पर्यावरणाचीही हानी

रसायनांचे टँकर अशाप्रकारे कोणतेही नियमांचे पालन न करता उघड्यावर धुण्याचे प्रकार गंभीर असून यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने पर्यावरणाची हानी होत असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे.

मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम

भरती-ओहोटी आणि कमी भरतीच्या प्रवाहासह, रसायने ओलसर जमिनीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी खाडीत आणि जिथे बरेच मासे मारतात. या बेकायदेशीर प्रक्रियेचा केवळ मासेमारी समुदायाच्या दैनंदिन व्यापारावर परिणाम होत नाही तर मातीसुद्धा प्रदूषित होत आहे, असे कुमार म्हणाले. यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी अशा घटनांकडे डोळेझाक करत आहेत. अशा घटनांमुळे पारंपरिक मच्छिमारांना मोठी किंमत मोजावी लागत असून त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन संपत चालले असल्याचे नंदकुमार पवार म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटीuran-acउरण