शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

ढगाळ वातावरणाचा रानमेव्याला फटका?

By admin | Published: May 12, 2016 2:17 AM

कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे

दासगाव : कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. करवंदांसारख्या विविध रानमेव्यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावात डोंगर आणि जमिनी विकण्याकडे ग्रामीण भागात कल वाढल्याने धनदांडग्यांनी हे डोंगर बोडके करण्याचा सपाटा लावला आहे. या वनतोडीमुळे करवंदाची रोपटी नष्ट होत असल्याने भविष्यात या रानमेव्याला चाकरमान्यांनादेखील मुकावे लागणार अशी, स्थिती निर्माण होत आहे. याच रानमेव्यावर उन्हाळ्यात आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. हा रानमेवा आता डोंगरावर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.कोकणात मे महिन्यात सुटीच्या कालावधीत नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेला चाकरमानी आपल्या गावात येतो. सुटीच्या काळात लहानापासून मोठ्यापर्यंत सारेच जण गावातील आंबे, रानातील करवंदे, काजूची बोंडे, आळू, जांभळे अशी विविध रानफळे खाण्यात गुंग होतात. आता रानमेव्याचा मोसम असून, रानात करवंद, जांभळे, आळू पिकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात निर्माण होणारे ढगाळ वातावरण, विविध भागात पडणारा पाऊस यामुळे हा मोसम हातून निघून जातो की काय, असे वाटू लागले आहे. पिकणारी करवंदे आणि जांभळावर पाऊस पडल्यास ही फळे बेचव होऊन जातात तर ताडफळे गळून खाली पडतात. रानमेवा खाण्याकरिता गावात आलेल्या चाकरमान्यांची पावले रानाकडे वळू लागली असतानाच पावसामुळे हा रानमेवा रुसतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.महाड तालुक्यात सर्वच भागात करवंदाची झुडपे आहेत. मधूर ही करवंदे कोकण वगळता इतर जिल्ह्यांत तसेच मोठ्या शहरांत मागणी असल्याने येथील आदिवासी ही करवंदे रानात जाऊन काढतात. आदिवासी करवंदे, जांभळे अशी रानफळे विकून चरितार्थ चालवत आहेत.(वार्ताहर)