शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

coronavirus: कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 2:15 AM

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही मार्केट सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी फळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी शिल्लक मालाची विक्री करण्यावर भर दिला. रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही व्यापारी आणि विक्रेत्यांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले.नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. तर शहरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास २४५ रुग्ण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत. राज्य शासनाने सोमवारपासून १७ मेपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पुरेल इतका अन्नधान्य आणि भाज्यांचा पुरवठा मुंबई शहराला करण्याच्या सूचना राज्य शासनाने एपीएमसी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार शनिवार जीवनावश्यक वस्तूंंच्या एक हजार गाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. तर रविवारी कृषिमालाच्या ६२१ गाड्या एपीएमसीतून बाहेर गेल्या आहेत. यात भाजीपाला १५५, कांदा-बटाटा १४, फळे ११२, मसाला १०५ आणि अन्नधान्याच्या २३५ गाड्यांचा समावेश आहे. बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी भाजीपाला, फळे आणि कांदा बटाटा यांचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस भाजीपाल्यांची कमतरता जाणवणार नसल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट आले आहे. दरम्यान, सोमवारपासून बाजारपेठा बंद राहणार असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या आणि फळे खरेदीसाठी बाजारपेठेत रविवारी गर्दी केल्याचे दिसून आले.स्थानिक बाजारात गर्दीएपीएमसी मार्केट सोमवारपासून बंद राहणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी रविवारी स्थानिक बाजारपेठेत गर्दी केली. आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला, फळे खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला. प्रत्येक नोडमध्ये तसेच मोकळ्या जागेत भरणाºया बाजारात गर्दी होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसली. अन्नधान्य व भाजीपाल्याच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिक कोरोनापासून बचावाकडे दुर्लक्ष होताना दिसले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या