शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
3
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
4
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
5
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
6
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
7
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
8
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
9
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
10
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
11
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
13
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
14
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
15
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
16
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
17
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
18
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
19
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
20
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक

coronavirus: क्वारंटाइन केंद्रात घुसमट, पनवेलमधील इंडिया बुल्स सेंटरमध्ये जमावाकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 2:21 AM

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - शहरातील कोरोनाचा विळखा वाढतच आहे. गेल्या दहा दिवसात रोज ४० ते ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे क्वारंटाइन रुग्णांची संख्या ९०० च्या घरात पोहोचलेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होण्याचे प्रमाण अल्प असल्याने अनेकांचा क्वारंटाइन कालावधी वाढतच चालला आहे.शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. वर्गवारीनुसार वाशी व पनवेलच्या इंडिया बुल्स येथे त्यांची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, पॉझिटिव्ह आलेल्या मात्र कसलाही त्रास नसलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची संख्या ६०० च्या घरात होती.गेल्या दहा दिवसांत त्यात सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी, क्वारंटाइन केंद्रात असलेल्यांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. तर ८,३९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत केवळ ७५ पॉझिटिव्ह रुग्ण दुसऱ्या व तिसºया चाचणीत पूर्णपणे निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत.क्वारंटाइन केंद्रातील बहुतांश व्यक्तींचा कालावधी वाढत चालला आहे. यामुळे अनेक जण एक महिन्याहून अधिक कालावधीपासून बंदिस्त आहेत. १४ दिवसांनी त्यांची टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये निगेटिव्ह आल्यानंतरही दुसरी टेस्ट घेण्यासाठी पुढील पाच ते सात दिवसांसाठी तिथेच ठेवले जात आहे.दुसºया टप्प्यातील चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे. तर दुसºया चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी ठेवले जात आहे.काही जणांची चौदाव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यानंतर पाच ते सात दिवसांनी घेतली जाणारी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचा कालावधी वाढला आहे. कुटुंबातील इतरांना अथवा राहत्या परिसरातील व्यक्तींना टाळण्यासाठी त्यांचे क्वारंटाइन सेंटरमध्ये अलगीकरण होत आहे.महिन्याभराहून अधिक कालावधी उलटल्याने अनेकांना घरचा रस्ताच बंद झाल्याची भीती सतावत आहे. तर आपला रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही तिथे ठेवल्याने पुन्हा कोरोना होईल, अशी भीतीही काहींना वाटत आहे. क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींना त्यांचा कालावधी वाढत असण्यामागची कारणे पटवून देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कुटुंबापासून एकाकी पडलेल्यांची घुसमट होत आहे.शहरातील क्वारंटाइन व्यक्ती व पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.च्पनवेलच्या इंडिया बुल्स येथे क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी इमारतीखाली जमाव जमवून संताप व्यक्त करीततत्काळ घरी सोडण्याची मागणी केली.च्अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन दिवसांपूर्वी सीबीडीतील एका व्यक्तीने क्वारंटाइन कालावधी वाढल्याने पळ काढला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई