शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

भारत महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी

By admin | Published: January 19, 2016 2:23 AM

ऐरोली येथील भारत महोत्सवाची सांगता विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यांनी झाली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी

नवी मुंबई : ऐरोली येथील भारत महोत्सवाची सांगता विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यांनी झाली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी सांस्कृतिक देशभ्रमंतीचा आनंद लुटला, तर अमृता खानविलकर, हेमांगी कवी अशा कलाकारांनी महोत्सवाला भेट देवून प्रेक्षकांच्या उत्साहात अधिकच भर टाकली.ऐरोली सेक्टर ८ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय भारत महोत्सवाची सांगता रविवारी मोठ्या उत्साहात झाली. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ठाणे लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. नवी मुंबईला स्मार्ट सिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे. अशावेळी शहरात वास्तव्य असलेल्या सर्वधर्मीयांना इतरांच्याही संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून झाला. एकवीरा देवीची भव्य पालखी काढून सुरवात झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विठ्ठल उमप थिएटर्स प्रस्तुत ‘मी मराठी‘ या कार्यक्रमातून नंदेश उमप व कलाकारांनी गायलेल्या गाण्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला, तर दुसऱ्या दिवशी संतोष चौधरी ऊर्फ दादुस याने गायलेल्या आगरी कोळी गाण्यांवर प्रेक्षकांनी ताल धरला होता. पहिल्या दोन दिवसांच्या भरगच्च प्रतिसादानंतर तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी अलोट गर्दी करत महोत्सवाची शोभा वाढवली. रविवारी महोत्सवाच्या तिसरी दिवशी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून भारतातील विविध राज्याची संस्कृती प्रेक्षकांपुढे मांडण्यात आली. रुद्राक्ष डान्स अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेली ही कलाकृती प्रेक्षकांना थक्क करणारी होती. गुजरात, आसाम, छत्तीसगड, मध्यप्रदेश व अनेक राज्यांमधील पारंपरिक नृत्ये उपस्थितांना प्रथमच पहायला मिळाली. तर आगरी संस्कृतीला आधुनिक तडका देत महिलांनी सादर केलेले नृत्य तर प्रेक्षकांना अधिकच भावले. अभिनेत्री अमृता खानविलकर, हेमांगी कवी व संजीवनी जाधव यांनी उपस्थित राहून प्रेक्षकांच्या उत्साहात अधिकच भर टाकली. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, प्रकल्पग्रस्तांचे नेते राजेश पाटील, उपआयुक्त बाबासाहेब राजळे, नगरसेविका पूनम पाटील, हेमांगी सोनवणे आदींनी महोत्सवाला भेटी दिल्या. महोत्सवातून नागरिकांची सांस्कृतिक भूक भागल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितांनाही भरभरुन दाद मिळाली. यावेळी राजाराम पाटील यांनी आगरी कोळी संस्कृतीचा उलगडा करत महिलांच्या सध्याच्या समाजातील स्थानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सँड आर्टिस्ट राहुल आर्य यांनी वाळूवर तयार केलेल्या कलाकृतीमधून प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी उभारलेल्या लढ्याचे चित्र प्रेक्षकांपुढे मांडले. लकी ड्रॉमध्ये भास्कर खैरनार यांनी सफारी तर आशा सुतार, साक्षी पाटील यांनी पैठणी पटकावली. (प्रतिक्रिया)अस्मानी संकट व कर्जाचा बोजा असह्य झाल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या मुलांपुढेही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यापैकी १०० शेतकरी कुटुंबांना बीडचे प्राध्यापक यशवंत गोस्वामी यांनी दत्तक घेतलेले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत महोत्सवादरम्यान प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते गोस्वामी यांना ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. यावेळी कदम व गोस्वामी यांनीही अनिकेत म्हात्रे यांच्या समाजोपयोगी उपक्रमाला दाद दिली.नवी मुंबईत अनेक महोत्सव होत असताना ते केवळ ठरावीक वर्गासाठी मर्यादित असतात. मात्र नवी मुंबई या आधुनिक शहरात देशातील विविध राज्यातील नागरिकांचे वास्तव्य आहे. राज्यातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडावे या उद्देशाने हा भारत महोत्सव आयोजित केला होता. - अनिकेत म्हात्रे, ठाणे लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष.