शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पावसामुळे कांद्यासह फळांचे नुकसान, भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू

By नामदेव मोरे | Published: November 28, 2023 5:58 PM

नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे.

नवी मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा फटका कृषी मालालाही बसला आहे. कांद्याचे नुकसान झाले असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक मात्र अद्याप सुरळीत असून पावसाचा नक्की काय परिणाम झाला हे पुढील काही दिवसामध्ये स्पष्ट होईल.

नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईमधील आवक घटली आहे. मंगळवारी ६२३ टन आवक झाली आहे. गत आठवड्यात कांदा प्रतीकिलो २८ ते ३८ रुपये दराने विकला जात होता. आता हे दर ३० ते ४६ रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपयांवर गेला आहे. पुढील काही दिवस कांद्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा फळांवरही परिणाम झाला आहे. द्राक्ष, डाळींब, कलींगड, अंजीर, स्ट्रॉबेरीच्या फळांचे नुकसान झाले आहे. फळे खराब होण्याचे प्रमाण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कांदा व फळांच्या तुलनेमध्ये भाजीपाला मार्केटमधील आवक सुरळीत सुरू आहे. मंगळवारी ४८६ वाहनांमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ९५ जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

नाशिक सह इतर ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.किशोर ठिगळे, व्यापारी

अवकाळी पावसाचा द्राक्ष, स्ट्रॉबेरी व इतर फळांना फटका बसला आहे. यामुळे फळे खराब होण्याची शक्यता आहे.संजय पानसरे, संचालक फळ मार्केट

भाजीपाला मार्केटमध्ये आवक सुरळीत सुरू आहे. अवकाळी पावसाचा अद्याप आवकवर खूप परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व इतर ठिकाणावरूनही आवक होत आहे.शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई