शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

नुकसान मुंबईतल्या कांदळवनाचे, झाडांची भरपाई मात्र गडचिरोलीत

By नारायण जाधव | Published: December 02, 2023 8:13 AM

Mumbai News: मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे होणारे १२.७८०८ हेक्टर कांदळवनाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राने भरपाई म्हणून ९०० किलोमीटर दूरवर असलेल्या गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या हा ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’ निर्णय आता अडचणीत आला आहे.

बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या रेेल्वे लाइन्ससाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाचे सहायक वन महानिरीक्षक सी. बी. तहसीलदार यांनी १७ नोव्हेंबरला ही तत्त्वत: मान्यता दिली. असा ‘अविचारी’ आदेश जारी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये, सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडमध्ये बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या भरपाईसाठी एमओईएफसीसीने जळगावच्या एका गावात परवानगी दिलेली आहे.

गडचिरोलीतील डीग्रेडेड वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यास आमची काहीच हरकत नाही, खरे पाहिले तर हे करणे गरजेचे आहे. परंतु, कांदळवन नष्ट करण्याच्या बदल्यात हे करण्याची गरज नाही, असे सांगून कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गाच्या जैवविविधतेत निराळ्या भूमिका बजावत असून, त्यांच्याकडून त्यांच्या नैसर्गिक गुणांची अदलाबदल होणे असंभव आहे.- नंदकुमार पवार, प्रमुख, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान

‘हा कांदळवन नष्ट करण्याचाच प्रकार’नवी मुंबईतील पर्यावरणवादी नाटकनेक्ट फाउंडेशनचे प्रमुख बी. एन. कुमार यांनी १२ हजारांहून अधिक खारफुटीचे डायव्हर्जन करणे म्हणजे कांदळवन नष्ट करण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारे त्याची भरपाई म्हणून ९०० किमी दूरवर वृक्षारोपणाद्वारे नुकसान भरून काढणे खूपच निरर्थक असल्याचे कुमार म्हणाले. अशा भरपाईमुळे गडचिरोलीच्या जंगलात मासे आणि खेकड्यांची पैदास होऊ शकते का आणि मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानीची भरपाई गडचिरोलीत कशी काय होऊ शकते, असे प्रश्न कुमार यांनी केले आहेत.

बाळकूम-गायमुखचे वृक्षारोपण चंद्रपूर जिल्ह्यातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या ठाण्यातील बाळकूम ते गायमुख या १३.२१५ किमीच्या सहापदरी सागरी रस्त्याच्या बांधकामात १२.२६०७ हेक्टर वनजमीन लागणार आहे. ती वळती करण्यास वने आणि पर्यावरण मंत्रालयाने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी दिल्याने ठाणे महापालिकेसह एमएमआरडीएला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या वन जमिनीच्या नुकसान भरपाईच्या बदल्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील कुकूधेती गावातील १५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईforestजंगलGadchiroliगडचिरोली