शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

वणव्यांमुळे वनसंपदेची हानी

By admin | Published: May 13, 2016 2:37 AM

रोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली

मिलिंद अष्टीवकर, रोहारोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली आठ दिवस सतत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने झाडेझुडपे, गवत जळून खाक झाल्याने परिसरातील हजारो जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. मागील दोन महिन्यांत डोंगरांमध्ये सातत्याने हे वणवे पेटलेले दिसून येत आहेत. गेल्या ८ दिवसांत ५ ठिकाणी वणवे लागले होते. रोहा वन विभागाची टीम हे पेटलेले वणवे विझविण्याचा प्रयत्न करतात,यासाठी त्यांना काही ठिकाणी गावकऱ्यांची मदत मिळत असली तरी जीव धोक्यात घालून वनपाल ही वाढत जाणारी आग रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.रोहा तालुका हा चहुबाजूंनी डोगररांगांनी बहरलेला आहे. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येथील डोंगरांना सतत वणवे लागण्याचे प्रकार गेल्या आठ-दहा दिवसांपासून घडत आहेत. तालुक्यातील कळसगिरी, हनुमान टेकडी, पाले, मढाली, खैरवाडी आणि अवचितगड मेढा पंचक्र ोशी आदी वरकस ठिकाणी वणवे लागल्याने वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी येथील डोंगरमाथा आगीने होरपळत असल्याचे दिसून येते. वणव्यांची तीव्रता फार मोठी असून धुराचे लोट नजरेस पडतात. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.या वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलात आढळणारे रानडुकरे, भेकर, ससे, कोल्हे, साळीदर, पोपट, मोर यासह खारींच्या जाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या वणव्यांमुळे वरकस भागात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या आंबा, काजू आदी फळबागांची व शेतीची हानी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत वनविभागाकडे कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरालगत कळसगिरीचा माथा ही उन्हाळ्यात नेहमी पेटलेलाच दिसून येतो. सुकेळी येथे लागणाऱ्या वणव्याची तीव्रता फार मोठी असते. मागे खांबच्या जंगलात सतत ८ दिवस आगीचे लोट दिसून येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा धुरांडा सहन करीत प्रवास करावा लागत होता. वणवे लागलेल्या बहुतांशी ठिकाणी जंगल गावानजीक असल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे.