शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप

By नामदेव मोरे | Updated: October 6, 2024 17:55 IST

पैशांचे राजकारण करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघात १०० कोटी वाटले. आत्ताही मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना महाराष्ट्राची सत्ता हवी आहे. येथील उद्योग पळविले जात आहेत. पैशांचे राजकारण व सत्तेचा दुरूपयोग करणारांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये आयोजीत सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत हाेते. राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेची कामे गुजराती ठेकेदारांना देण्याचे राजकारण केले जात आहे. मुंबईसह संपूर्ण राज्य लुटण्यासाठीच दिल्लीश्वरांना सत्ता हवी आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आहे. सर्वत्र पैशांचे राजकारण केले जात आहे. लोकसभेच्यावेळी एका मतदार संघासाठी १०० कोटी रूपये खर्च केले. साताराला ७० ते ८० हजार मते ३ ते ४ हजार रुपये देवून खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सत्तेचा दुरूपयोग करणारांना जनता कंटाळली आहे. महाविकास आघाडीला प्रतिसाद वाढत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नक्की परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये येणारांची संख्या वाढत आहे. या निवडणुकीमध्ये सातारावासीयांनी एकजुट होऊन सहकार्य करा. सर्वांनी गावी येवून परिवर्तन घडविण्यासाठी सहकार्य करा. मुंबईतील सातारकर एकवटला की परिवर्तन घडतेच हे आपण यापुर्वी अनुभवले आहे. कोरेगावसह सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आपणास निवडूण आणायचे आहेत.

मुंबईकरांनी गावोगावी जावून निवडणूक हाती घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत शरद पवार यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी पुर्ण क्षमतेने पेलण्याचा प्रयत्न केला. यापुढेही एकनिष्ठपणे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सी. आर. पाटील, मंगेश आमले, माथाडी नेते गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव यांच्यासह सातारा, कोरेगाव मधील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदे