शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

गावांचा विकास आव्हानात्मक

By admin | Published: May 06, 2017 6:26 AM

नवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा

अरूणकुमार मेहत्रे/  लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा विकास करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण, रस्ते, गटारे या सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी अ, आ, ईपासून सुरूवात करावी लागणार आहे. सिडकोने येथील जमीन संपादित करताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहती जरी झकास झाल्या असल्या तरी गावे मात्र भकासच राहिले आहेत. पनवेल महानगरपालिकेत २९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी बरेचशी गावे प्रभाग १ ते ३ मध्ये येतात. त्या गावांपर्यंत नागरीकरण सुध्दा आले आहे तसेच टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. असे असले तरी पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. दळवळणाकरिता रस्ते उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता येथे गटारे नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मलनि:सारण केंद्रे नाहीत की घनकचरा उचलला जात नाही. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था नाही. अनेक ग्रामपंचायती हा कचरा महामार्गालगत किंवा नदीच्या पात्रात डम्प करीत होत्या आणि महापालिका झाल्यानंतरही बदललेली नाही. जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या व्यतिरिक्त या भागात रस्त्यांची निर्मिती करणे सुध्दा अतिशय अवघड याचे कारण म्हणजे मनाला वाटेल त्या ठिकाणी इमारती, घरे उभारण्यात आलेले आहे. गावागावांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अडचणी येणार आहे. घनकचरा उचलण्याकरिता वेगळी यंत्रणा उभारावी लागेल त्याशिवाय त्याची विल्हेवाट लावायची कुठे आणि कशी याबाबत नियोजन करावे लागणार आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये मलनि:सारण केंदे्र उभारावी लागतील त्याकरिता जागेची उपलब्धता करावी लागणार आहे.अनिधकृत बांधकामे जास्तबिनशेती परवाना त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेवून टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही.तीनही प्रभागांना प्रदूषणाचा विळखातळोजा एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या या तीनही प्रभागाला प्रदूषणाचा विळखा आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडत आहेत. त्याचबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. प्रभाग क्र मांक-१च्या हद्दीत सिडकोचे डम्पिग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कचरा डम्प करू दिला जात नाही.