शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

दुष्काळग्रस्तांची पोलीस भरतीसाठी धावपळ

By admin | Published: April 01, 2016 2:53 AM

राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट

- वैभव गायकर,  पनवेलराज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट नवी मुंबईकडे आपली धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील भरतीसाठी हे तरुण कळंबोली पोलीस मुख्यालयात चाचणीसाठी आले आहेत. पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुष्काळी पट्ट्यातील तरुणांची आहे. अकोला, धुळे, सातारा, सांगली, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, लातूर आदीसह मराठवाडा व विदर्भाच्या लहान खेड्यातून तरुण याठिकाणी आलेले आहेत. लांबचा प्रवास करून आलेल्या तरुणांना बस स्थानक, रेल्वे स्थानकावर रात्र घालवावी लागत आहे. कागदपत्रे तपासणीसाठी वेगळी तारीख त्यानंतर शारिरीक चाचणीसाठी वेगळी तारीख यामुळे काहींना हेलपाटे मारावे लागणार आहेत तर काही जण याच ठिकाणी मुक्कामाला थांबले आहेत. नंदुरबार याठिकाणाहून आलेला मच्छींद्र भोई हा वीस वर्षीय तरुण २९ तारखेला याठिकाणी आलेला आहे. ठाण्याला मामा असल्याचे त्याने त्याच ठिकाणी आपला मुक्काम केला आहे. अकोला येथून आलेला श्रीकृष्ण मुंडेकर हा तरुण दोन दिवसांपासून नवी मुंबईत आलेला आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने रस्त्यावरच मुक्कामाला राहावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. रस्त्यांच्या दुभाजकावर लावलेल्या झाडांच्या सावलीत तरुण बसत असल्याने अपघाताचा धोका असल्याचे काहींनी सांगितले.पोलीस मुख्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवरील पत्र्यांचा आधार घेवून अनेक तरुण विसावा घेत असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे. परीक्षार्थींसोबत आलेल्या पालकांचे देखील हेच हाल आहेत. शासनामार्फत परीक्षार्थींसाठी कोटींचा निधी खर्च केला जातो, तो जातो कुठे? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित असलेल्या गणपती पाटील या पालकाने उपस्थित केला. परीक्षार्थींसाठी बसायची व्यवस्था नाही. मुख्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांना आंघोळ तसेच झोपण्याची काहीच व्यवस्था नाही.