शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

रमजानमुळे खजूरला ग्राहकांची पसंती, ८० ते २५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री

By नामदेव मोरे | Published: March 24, 2023 7:05 PM

बाजार समितीमध्ये आवक वाढली

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खजूरची आवक वाढू लागली आहे. प्रतिदिन २० ते २५ टन विक्री होत असून २१ मार्चला विक्रमी १०६ टन विक्री झाली आहे. जगभरातून जवळपास ५० प्रकारची खजूर विक्रीसाठी येत असून दर्जा प्रमाणे प्रतिकिलो ८० ते २५०० रुपये दराने विक्री होत आहे.

हिवाळ्यात व रमजानच्या महिन्यामध्ये ग्राहकांकडून खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. उपवास सोडण्यासाठी खजूर चा उपयोग होत असल्यामुळे या कालावधीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० ते २५ टनांची आवक होत आहे. इराक, इराण, इजिप्त, सौदी अरेबीया व इतर देशांमधून खजूरची आवक होत असते. दर्जा प्रमाणे खजूरला बाजारभाव मिळत असतो. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा खजूरची सरासरी ८० ते १५० रुपये दराने विक्री होत आहे. उत्तम प्रतिच्या खजूरला प्रतिकिलो २५०० पर्यंतचा भाव मिळत आहे.

बाजार समितीचे माजी संचालक किर्ती राणा यांनी सांगितले की नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. यामुळे हिवाळा व रमजानच्या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सद्यस्थितीमध्ये विविध प्रकारची व उत्तम प्रतिची खजूर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई