शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

ईएसआयसी कामगार वसाहत मोडकळीस

By admin | Published: June 20, 2017 6:02 AM

पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे.

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची पर्यायी सोय केली जात नसल्यामुळे, ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पालिकेने गतवर्षी त्या ठिकाणच्या चार व यंदा नऊ इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण वसाहतच राहण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, यानंतरही कामगारांची राहण्याची पर्यायी सोय न करता, ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कामगारांच्या जीवावर टांगती तलवार निर्माण केली आहे.शासनाच्या वाशीतील कामगार रुग्णालयाचे कामगार मागील अनेक वर्षांपासून रोज मृत्यूशी सामना करत आहेत. इमारत मोडकळीस आलेली असतानाही, त्यांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. काही कामगार निवृत्तीच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यांच्याकडून आलेला दिवस कसाबसा काढण्याचे काम सुरू आहे. मागणी करूनही रुग्णालय प्रशासन कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवत नसल्याचीही खंत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनच कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. गतवर्षी महापालिकेने त्या ठिकाणच्या चार इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. या वेळी तीन इमारतींमधील कामगारांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच यंदा महापालिकेने त्या ठिकाणच्या उर्वरित नऊ इमारतीही धोकादायक घोषित केल्या आहेत. सर्वच इमारतींची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नसल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात इमारतींची डागडुजी झाली नसली, तरी प्रतिवर्षी डागडुजीचा खर्च मात्र मंजूर होत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे बळी कामगार ठरू नयेत, याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.मोडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी केल्यानंतर त्या इमारतींचा रहिवासी वापर होऊ शकतो. यामुळे अनेकदा कामगारांनी इमारतींसह संपूर्ण घरांच्या डागडुजीची मागणी केली आहे; परंतु निधीअभावी इमारतींच्या डागडुजीला टाळाटाळ करणारे वरिष्ठ अधिकारी, मर्जीतल्या कामगारांच्या घरांवर मात्र लाखोंचा खर्च करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. मोडकळीस आल्याने खंडर झालेल्या इमारतींभोवती झाडी वाढली असून, त्यामध्ये विषारी प्राण्यांचे वास्तव्य होऊ लागले आहे. मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी साप आढळून आले असल्याने लहान मुलांचे घराबाहेर खेळणेही धोकादायक झाले आहे.