शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

५७५ प्रकल्पग्रस्तांचा भूखंडाचा वनवास संपेना;  शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार?

By कमलाकर कांबळे | Updated: July 31, 2024 08:53 IST

विशेष  म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नैनातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनावरून सिडकोशी संघर्ष सुरू आहे. मात्र, यातून शहाणे न होता सिडकोने द्रोणागिरी परिसरातील प्रकल्पग्रस्तांना मागील १४ वर्षांपासून साडेबारा टक्के योजनेतील भूखंडाचे वाटपच  केलेले  नाही. यामुळे सिडकोविरोधातील प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. 

विशेष  म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती. मात्र, वर्ष उलटले तरी एकाही प्रकल्पग्रस्ताला साडेबारा टक्के भूखंडाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील चौदा वर्षांपासून केवळ आश्वासनांवर आमची बोळवण केली जात आहे. ठोस कार्यवाही कधी होईल, असा सवाल त्यांनी केला आहे. 

रायगड मधील उरण तालुक्यातील  बोकडवीरा, चाणजे, पागोटे, नागाव, रानवड, नवघर या ७ गावांमधील ३६४ हेक्टर जागा संपादित करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. 

साडेबारा टक्के भूखंड वाटपाची सद्यस्थिती

नवी मुंबई शहरातील साडेबारा टक्के भूखंड योजनेच्या ३,२५७ लाभार्थ्यांना १७१.९६ हेक्टर जागा वाटप करायची आहे. त्यापैकी १६६.०७ हेक्टर जागेचे वाटप केले आहे.  पनवेल तालुक्यात ३,६९५ लाभार्थी असून, त्यांना ५६३.१ हेक्टर जागेचे वाटप करायचे आहे.  उरणमध्ये १,६१८  प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना १३५  हेक्टर जागेचे वाटप करायचे आहे. 

३२.४२ हेक्टर जागा हवी

सिडकोने रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील २८ गावांतील ४,५८४ हेक्टर जागा संपादित केली. त्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेंतर्गत १३४ हेक्टर क्षेत्र  प्रकल्पग्रस्तांना वाटप करायचे आहे.  त्यापैकी आतापर्यंत १,०४३ प्रकल्पग्रस्तांना १०२.९२ हेक्टर जागेचे वाटप केले. अद्याप ५७५ प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचा लाभ मिळालेला नाही. सिडकोला ३२.४२ हेक्टर जागेची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :cidcoसिडको