शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:26 IST

उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे. ती पुन्हा निर्माण होणार नाही. तीला क्षणिक सुखासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोलाने  विकू नये असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील यांनी शनिवारी उरण येथील एका  जाहीर कार्यक्रमातुन केले.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ५० वर्षातील विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल शनिवारी (७) सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जेएनपीए कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानव जात एक आहे. तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेदभाव का ? असा सवालही कोळसे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले,सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब , अशिक्षित , अज्ञानी ठेवून राज्यकर्ते राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा हा न भिणारे जीवन  आहे. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते म्हणूनच माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजासाठी जगले पाहिजे, निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले पाहिजे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे हक्कासाठी जनशक्ती व अहिंसेच्या मार्गाने  ढण्याचे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, सुरेश ठाकूर, भूषण पाटील,सुधाकर पाटील,गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, नरेश रहाळकर, ॲड .सुरेश ठाकूर, अनिल जाधव, शाम कुलकर्णी , जीवन गावंड, महेश म्हात्रे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.