शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 8:07 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती.

नवी मुंबई : हटायचे नाही, झुकायचे नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार जालना, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक गावातून घराघरातून नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. खिशातील पैसे खर्च करून वाहनांचा बंदोबस्त केला आहे. जेवणापासून राहण्यापर्यंत सर्व तयारी करूनच लढ्यात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती. अनेक जण १७ जानेवारीपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणची तयारी, वैद्यकीय तपासणी व इतर आवश्यक कामे करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. या सर्वांची मसाला मार्केटमध्ये सोय केली होती. माथाडी कामगार, व्यापारी व सकल मराठा समाजाने या सर्वांच्या अंघोळ, पाणी व जेवणाची सोय केली होती. मराठा आंदोलनाच्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चा व त्या अगोदरपासूनही चळवळीमध्ये सक्रिय आहे. आता निर्णायक लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी ते नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासामध्ये दिवसेंदिवस आंदोलनाला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.  

प्रत्येक गावातील मराठा समाजातील तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्ही स्वखर्चाने गाडी करून आलो असून, आरक्षण मिळेपर्यंत लढ्यात सहभाग कायम असेल. - गणेश पाचकोट, परभणी

शेतात काही पिकत नाही. मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत. शिकलेल्या मुलांना नोकरी नाही. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आता माघार घ्यायची नाही. - माधव कदम, बोर्डा, गंगाखेड, परभणी

मराठा आरक्षणासाठीच्या आतापर्यंतच्या सर्व लढ्यात सहभागी होत आलो आहे. लढा आता निर्णायक टप्प्यात आला असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.     - सोपान क्षीरसागर, जालना

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील