शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा

By admin | Published: May 08, 2017 6:28 AM

गेल्या काही वर्षांत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला

लोकमत न्यूज नेटवर्कवडखळ : गेल्या काही वर्षांत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा, असे प्रतिपादन पेण-पाली मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण तालुक्यातील गणपतीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात काढले. कोकण कृषी, फलोत्पादन, पर्यटन, सौरऊर्जा, दुग्धविकास, पशुसंवर्धन, औषधे, सेंद्रिय उत्पादने, खते यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेकर, राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष चंद्रकांत मोकल, शिरीष देशपांडे, डॉ. एल. ए. चव्हाण, भात शास्त्रज्ञ डॉ. विजय देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तुषार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हेटवणे धरण होऊन ३५ वर्षे झाली, तरी तालुक्यातील खारेपाटातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी 30 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्याचे उद्घाटन होईल आणि खारेपाटातील जनतेला पाणी मिळेल, २००७ मध्ये शासनाने कालव्यांची बंद केलेली कामे पुन्हा सुरू करावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.