शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:35 IST

नेरुळमधील दत्तगुरू सोसायटीमधील १३६ कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी वेळेत देत नाही

नवी मुंबई : नेरुळमधील दत्तगुरू सोसायटीमधील १३६ कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी वेळेत देत नाही. यामुळे रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे.नवी मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये नेरुळ सेक्टर ६मधील दत्तगुरू सोसायटीचा समावेश आहे. इमारतीचे जिने, छताचे प्लास्टर वारंवार पडू लागले आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. इमारतीच्या पुनर्बांधणीला परवानगी मिळावी, यासाठी रहिवासी अनेक वर्षांपासून सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु अद्याप परवानगी दिली जात नाही. वाढीव चटईक्षेत्र देण्यासाठी या परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या मंडईचा अडसर येऊ लागला आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी या प्रश्नाचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. किती दिवस रहिवाशांना पालिकेच्या पायºया झिजविण्यास लावले जाणार आहे. आता सहनशीलतेचा अंत होत असून, ७ दिवसांमध्ये पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही पुनर्बांधणीचे प्रस्ताव रखडविले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांची स्थिती गंभीर आहे. कोणत्याही क्षणी इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.