शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

अखेर कल्याण-कर्जत महामार्ग १०० फुटी

By admin | Published: November 28, 2015 1:12 AM

शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत

उल्हासनगर : शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत. बाधितांना पर्यायी जागा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली असून शासनाच्या निर्णयाने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. उल्हासनगरच्या मधोमध कल्याण-कर्जत महामार्ग जात असून रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीएने हाती घेतले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी ५० ते ६० फूट असल्याने वाहतूककोंडी नेहमीची झाली आहे. यामुळे हे रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र, १०० फुटी रस्ता रुंदीकरणाचा फटका ८२१ दुकानांसह तीन रहिवासी इमारतींना बसत आहे. रस्ता १०० ऐवजी ८० फुटी करण्याची मागणी स्थानिक राजकीय पक्षांसह व्यापाऱ्यांनी शासनासह मुख्यमंत्र्यांकडे केली. तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी भविष्यातील विचार करता रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण कसे आवश्यक आहे, याची टिप्पणी शासनासह मुख्यमंत्र्यांना दिली होती. गेल्या ३ वर्षांपासून रस्त्याचे भिजत घोंगडे असून रस्ता बांधकाम करण्याची मुदत ३१ मार्च २०१५ रोजी संपली आहे. रस्त्याची मुदत संपल्याने एमएमआरडीएवर पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. पालिकेने बाधित दुकानांना नोटिसा दिल्या असून कारवाईचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले आहेत.महापालिकेने बाधित व्यापाऱ्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच स्थानिक राजकीय पक्षांनी १०० ऐवजी ८० फूट रस्ता रुंदीकरण करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून शासनाला पाठविला होता. ठराव विखंडित करून रस्ता १०० फुटी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांत नाराजी पसरली असून मुख्यमंत्र्यांना पुन्हा साकडे घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)