शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
2
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
3
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
4
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
5
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
6
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
7
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
8
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
9
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
10
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
11
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
12
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
13
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
14
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
15
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
16
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
17
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
18
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
20
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

By नारायण जाधव | Published: September 13, 2022 12:05 PM

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते.

नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाने अखेर ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील ती १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून, महापालिकेची पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर हद्द निश्चितीसंदर्भातील आदेश सोमवारी रात्री उशिराने काढले आहेत. या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून त्या संदर्भातील हरकती व सूचना एका महिन्याच्या आत शासनाने मागविल्या आहेत. शासनाने काढलेल्या या आदेशानंतर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने आनंद व्यक्त केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकींवर बहिष्कारया गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. त्यानंतर रात्री ती महापालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश निघाले.

ही आहेत ती १४ गावे -दहिसर, मोरी, निघू, वाकळण, नावाळी, भंडार्ली, बाळे, बामार्लि, गोठेघर, उत्तरशिव, पिंपरी, नारीवली, नागाव यांचा यात समावेश आहे.

पूर्वी ही गावे होती महापालिकेत -ही गावे १९९५ साली ही नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होती. येथून दोन नगरसेवक निवडून आले होते. येथे रस्ते, गटारे, पायवाटा. माता बाल रुग्णालय नवी मुंबई महापालिकेने बांधले होते. मात्र मालमत्ताकर वाढीवरून ती बाहेर पडली होती.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाthaneठाणेkalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकार