शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

गणपती बाप्पा पावला! ३५० टन नारळाची आवक; १,८६४ टन फळांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:52 AM

माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई :

माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे. मंगळवारी फळ मार्केटमध्ये तब्बल १ हजार ८६४ टन फळांची विक्री झाली आहे. ३५० टन नारळ, ३७४ टन साखरेसह गुळालाही मागणी वाढली आहे. उत्सवामुळे केळी, संत्री, मोसंबी, सफरचंदला ग्राहकांनी पसंती दिली आहे. 

बाजार समितीमधील मसाला मार्केटमध्ये तीन दिवसांमध्ये जवळपास १ हजार टन नारळाची विक्री झाली. मंगळवारी ३५० टन नारळाची आवक झाली आहे. गणेशोत्सवाबरोबर घरगुती वापरासाठीही नारळाला मोठी मागणी असते. दक्षिणेतील राज्यांतून नारळाची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये दिवसभरात ३७४ टन साखर, ३३ टन गूळ, ३ टन तुपाची आवक झाली आहे. सुक्यामेव्यालाही समाधानकारक मागणी होती.

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी १२०० ते १५०० टन फळांची आवक होत आहे. गणेशोत्सवामुळे १८०० टन फळांची आवक झाली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी यांना गणेशभक्तांकडून मोठी मागणी आहे. उत्सवामुळे केळीचाही खप वाढला आहे. बाजार समितीच्या बाहेरील पूजा साहित्य व इतर वस्तू  खरेदीच्या मार्केटमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. 

    वस्तू    बाजारभाव    आवक (टन)     कलिंगड    ६ ते १० किलो     ४२३    साखर    ३३ ते ३६ किलो     ३७४    नारळ    १२ ते २० नग     ३५०    संत्री    ६० ते ९० किलो     २६४    पपई    १० ते २६ किलो     २२५    मोसंबी    ४० ते ८० किलो     १८८    अननस    २० ते ४० किलो     १२९    सफरचंद    ७० ते १०० किलो     ११५    डाळींब    ८० ते १५० किलो     ७५    चिक्कू    ३० ते ४० किलो     ४३    गूळ    ४६ ते ५१ किलो     ३३सण, उत्सव काळात फळांनाही मागणी वाढते. माघी गणेशोत्सवात देवापुढे प्रसाद ठेवण्यासाठी व पूजेसाठी फळांची आवश्यकता असते. सध्या बाजार समितीमध्ये संत्री, मोसंबी, सफरचंद, कलिंगड, अननस व इतर फळांची चांगली आवक होत आहे.     - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट