शहरं
Join us  
Trending Stories
1
नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय
2
Nawab Malik फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?
3
Hathras Stampede : ज्या मातीसाठी हाथरसमध्ये झाली चेंगराचेंगरी, त्यात काय होतं? समोर आली मोठी माहिती
4
ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 
5
अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..."
6
Vraj Iron and Steel Share : शेअर बाजारात एन्ट्री घेताच लागलं अपर सर्किट, आयर्न कंपनीच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग
7
'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो
8
Hathras Stampede : "मी सत्संगला जाण्यापासून रोखलं पण..."; चेंगराचेंगरीत कुटुंब उद्ध्वस्त, काळजात चर्र करणारी घटना
9
Kakuda Trailer: 'मुंज्या' फेम दिग्दर्शकाचा हॉरर कॉमेडी 'ककुडा', रितेश देशमुख-सोनाक्षी सिन्हा झळकणार
10
"मी रॅपिडो कधीच बुक करणार नाही"; अपघातानंतर ड्रायव्हर पळाला, तरुणीने सांगितली आपबीती
11
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
12
बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी
13
५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान? शूरा खानसह मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, चर्चांना उधाण
14
दिशा पटानी १२ वर्षे मोठ्या प्रभासला करतेय डेट? हातावरील टॅटूमुळे अफेयरच्या चर्चेला उधाण
15
"मैत्रीचं, प्रेमाचं धुकं भरून टाकतं आभाळ का मग....", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
16
हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही
17
Share Market Opening : सेन्सेक्सनं रचला इतिहास, पहिल्यांदाच ८०००० पार, निफ्टीही ऑल टाईम हायवर
18
Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय
19
ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?
20
"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

डीपीएस तलाव महापालिकेकडे हस्तांतरणास गणेश नाईक यांची सहमती; पर्यावरणप्रेमी आंदोलनास मिळाले बळ

By नारायण जाधव | Published: June 28, 2024 3:43 PM

नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता.

नवी मुंबई : पाचबीच मार्गावरील ३० एकरातील डीपीएस फ्लेमिंगो तलाव नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांरित करण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला आमदार गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. यासाठी स्वत:सुद्धा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.

नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता. या तलावात भरतीचे पाणी येण्यासाठी असलेले सिडकोेने बुजविलेले चोक पॉइंट गणेश नाईक यांनी केेलेल्या आंदोलनानंतर नवी मुंबई महापालिकेने तोडून भरतीचे प्रवाह पूर्ववत केले होते. यामुळे सिडकोने यावरून महापालिकेविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

सिडकोविरोधात तक्रारींचा पाऊस

सिडकोच्या या कृतीविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून सिडकोवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन गृह सचिव, पर्यावण सचिव, नगरविकास सचिव यांना वेगवेगळ्या प्रकारांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळीवर कब्जा

सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे २५ तलाव हस्तांतरित केले आहेत. परंतु डीपीएस आणि एनआरआय फ्लेमिंगो तलावासह एनआरआय व टीएस पाणथळीवर कब्जा केलेला आहे. यात एनआरआय आणि टीएस चाणक्य यांच्या दुहेरी पाणथळ जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, सिडकोने डीपीएस तलावावर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केल्याने हा विषयावर पर्यावरणप्रेमींसह लोकप्रतिनिधींत संताप व्यक्त होत आहे.

सरकारकडे पाठपुरावा करणार

नवी मुंबईतील पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बी. एन. कुमार यांनी गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून डीपीएस तलाव संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेकडे सुपुर्द करणे आवश्यक असल्याची मागणी केल्यावर त्यांनी ती मान्य केली. एवढेच नव्हे तर हा तलाव वाचवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांचे कौतुक करून याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.