शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:22 IST

नागरिक नाराज; स्वच्छता अभियानाकडे होत आहे दुर्लक्ष

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय इमारतीच्या आवारात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. खराब झालेले टायर, वापरात नसलेल्या मोटरसायकल, फर्निचर ठेवण्यात आले आहेत. यामुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होत असून स्वच्छता अभियानादरम्यान तरी येथील कचरा उचलण्यात यावा अशी मागणी होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक सरकारी कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालयाच्या इमारतीच्या वाहनतळ परिसरातील कचरा अनेक वर्षांपासून हटविला जात नाही. या ठिकाणी बाजार समितीच्या वाहनांचे वापर करून झालेले टायर टाकण्यात आले आहेत. कार्यालयातील फर्निचरचा कचराही याच ठिकाणी टाकण्यात आला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वापरात नसलेल्या मोटरसायकलही या ठिकाणी उभ्या केल्या आहेत. यामुळे वाहनतळ परिसराला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्यालय इमारतीच्या मागील बाजूला जुने पत्रे व बांधकामाचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. सांडपाणीही वाहून नेणारी वाहिनी फुटल्यामुळे पाणी वरती येत आहे. बाजार समिती प्रशासनाने कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहाजवळ स्वच्छता अभियानाचे बॅनर लावले आहेत. परंतुु प्रत्यक्षात मात्र अभियान गांभीर्याने राबविले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.मार्केटमध्येही श्रमदान करण्याची मागणीमुंबई बाजार समितीमध्ये प्रशासन व व्यापारी, कामगार यांचा स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग हवा आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये कोणती कामे करायची याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व संचालक मंडळाने यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती