शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट

By admin | Published: August 11, 2015 3:32 AM

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आला असून, राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. हा नवी मुंबईकरांचा बहुमान आहे. भविष्यात अजून

नवी मुंबई : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आला असून, राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. हा नवी मुंबईकरांचा बहुमान आहे. भविष्यात अजून लोकाभिमुख सुविधा पुरवून स्वच्छतेसह सर्वच क्षेत्रात शहरास प्रथम क्रमांकावर घेवून जाण्याचा निर्धार महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईचा स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये देशात तिसरा क्रमांक आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेच्या धोरणांविषयी माहिती दिली. दोन दशकांच्या वाटचालीमध्ये महापालिकेने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयांमुळे शहराचा नावलौकिक देशभर वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. मोरबे धरणामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. शहराची लोकसंख्या १२ लाख असून ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करता येईल एवढी धरणाची क्षमता आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरात मलनिस्सारण केंद्रातील पाणी समुद्र किंवा नदीमध्ये सोडून दिले जात आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने सहा अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्रे उभी केली असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह बहुतांश सर्व शहरांना डम्ंिपग ग्राउंडचा प्रश्न भेडसावत आहे. नवी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक क्षेपणभूमी तयार केली आहे. त्यामध्ये खतनिर्मितीही केली जात आहे. आदर्श प्रकल्प उभा केला आहे. कचरा वाहतुकीची समस्याही आता सुटली आहे. पाणी, मलनिस्सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापन यासाठी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच शहराला स्वच्छतेसाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे. यावेळी माजी महापौर सागर नाईक, आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, माजी सभागृह नेते अनंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, शहर अभियंता मोहन डगावकर उपस्थित होते. पुरस्कार मिळवून देणारे प्रकल्प महापालिकेने नेरूळ व वाशीमध्ये १०० दशलक्ष लिटर क्षमतेचे अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. ऐरोलीमध्ये ८०, कोपरखैरणेमध्ये ८७, सानपाडामध्ये ३७ व सीबीडीमध्ये १८ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. सर्व केंद्रांची क्षमता ४२४ दशलक्ष लिटरची आहे. शहरात ३४१ किमीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पाणीपुरवठा स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. शहरात ६६८ लांबीची पाइपलाइन करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. मोरबे धरणामुळे पुढील तीस वर्षांत शहरास पाण्याचा तुटवडा भासणार नाही. क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड)मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली व इतर अनेक शहरांना डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न भेडसावत आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक क्षेपणभूमी तयार केली आहे. शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. लिचेट ट्रिटमेंट प्लँट तयार केला आहे. कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे केले जात आहे. कोपरखैरणेमधील क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून तेथे उद्यान फुलविण्यात आले आहे.