शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अलिबागमध्ये भीषण पाणीटंचाई

By admin | Published: May 01, 2017 6:39 AM

उन्हाचे चटके असह्य होत असतानाच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. जिल्ह्याची

अलिबाग : उन्हाचे चटके असह्य होत असतानाच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या अलिबाग तालुक्यात पाणीटंचाईचे भयावह चित्र दिसत आहे. पाणीपुरवठा योजना एकीकडे फोल ठरल्या, तर दुसरीकडे विहिरी आणि धरणेही कोरडी पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये सुमारे पाच दिवस आड नळाला पाणी येते. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड अडचण झाली आहे. पाणीटंचाईचे हे चित्र दरवर्षी खंडाळे गावात अनुभवण्यास मिळते. गावात पाणीयोजना राबविण्यात आली असली, तरी तेथील नागरिकांच्या नशिबी असणारी पाणीटंचाई काही संपलेली नाही. गावात पुरेसे पाणी मिळत नसल्याने काही महिला या जवळील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधून दीड किलोमीटरची पायपीट करून पाण्याची व्यवस्था करीत आहेत. काही नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेत आहेत. ज्यांना विकत घेणे परवडते ते घेतात; परंतु ज्यांना पाणी विकत घेता येत नाही. त्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. खंडाळा गावापासून जवळच असणाऱ्या सागरगड आदिवासीवाडीवरही अशीच परिस्थिती आहे. वाडीवर असणाऱ्या विहिंरीनी तळ गाठला आहे. त्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसले, तरी तहान भागविण्यासाठी तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.तालुक्यातील तीनविरा धरणाच्या माध्यमातून परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाच्या झळा कमालीच्या असल्याने या धरणांनी तळ गाठायला सुरु वात केली आहे. त्यामुळे पाणीकपातीचे धोरण राबवून आठवड्याचे दोन दिवस या २२ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उर्वरित दिवशी पाणीपुरवठा सुरू असला, तरी होणारा पाणीपुरवठा हा अनियमित आणि कमी दाबाने करण्यात येत आहे. हाशिवरे ग्रामपंचायतीमधील महिलांना पाण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. येथे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या झऱ्यातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. गावातील बोअरवेलला पाणी नसल्याने या झऱ्याचे पाणी महिलांना भरावे लागत आहे. (प्रतिनिधी)पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीबोडणी येथील नागरिकांना खासगी टँकरचालकांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टेम्पोमधून आजूबाजूच्या गावांमधून हजार लिटर पाण्याच्या टाक्या भरून पाणी आणले जात आहे. या गावातील नागरिकांना हजार लिटर पाण्यासाठी तीनशे रु पये मोजावे लागत आहेत. रामराज परिसरातील उमटे धरणातूनही आठवड्यातील दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात येत नाही. हे धरण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. जो काही पाणीपुरवठा करण्यात येतो. तोही अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याचे उमटे धरणावर पाणी शुद्धीकरण प्रकल्प नसल्याने आम्हाला शुद्ध पाणीच मिळत नाही, असे अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी सांगितले.अलिबाग तालुक्यामध्ये पाणीटंचाईचे भीषण वास्तव आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, तसेच त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.