शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2023 7:00 PM

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत.

- मधुकर ठाकूर

उरण: उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस करण्यात आलेली कपात कमी करुन रविवारी पाणी पुरवठा करण्याचे आदेश रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत एमआयडीसीला दिलं आहेत. उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची पाणीपातळी खालावली आहे.त्यामुळे उरण एमआयडीसीने ऐन उन्हाळ्यातच मागील दोन महिन्यांपासून आठवड्यातून तीन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद करून पाणी कपात केली आहे. यामुळे मात्र उरण शहराला पाणी टंचाईने ग्रासले आहे.

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी एमआयडीसीला पत्र देऊन आठवड्यातील बंद करण्यात आलेल्या तीन दिवसांपैकी रविवारी एक दिवस पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी उरण एमआयडीसीला लेखी पत्राद्वारे केली होती. तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी यांची भेट घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी विनंतीही केली होती. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून सकारात्मक मिळाला नाही. त्यामुळे उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केली होती.बालदी यांच्या विनंतीवरून उदय यांनी  मंत्रालयात बैठक बोलाविली होती.

मंत्र्यांच्या दालनात शुक्रवारी (३) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार महेश बालदी, आमदार  प्रशांत ठाकूर , भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष  जयविंद्र कोळी, उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, उरण नगरपालिकेचे अभियंता झुंबर माने आदी उपस्थितीत होते. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत रानसई धरणातून उरण शहराकरिता दर रविवारी पाणीपुरवठा सुरू ठेवणेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला आदेश दिले  आहेत.त्यामुळे येत्या रविवार पासून दर रविवारी पाणीपुरवठा थोड्या फार प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNavi Mumbaiनवी मुंबई