शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

जुईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By admin | Published: April 04, 2016 2:17 AM

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे

नामदेव मोरे,  नवी मुंबईरेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे. उघडी गटारे, साचलेले पाणी, बंद इमारतींमधील घाणीचे साम्राज्यामुळे पूर्ण जुईनगर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू लागली असून, परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सर्वाधिक घाणीचे साम्राज्य असणारी वसाहत म्हणून जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीकडे पाहिले जाऊ लागले आहे. मध्ये रेल्वे प्रशासनाने १९९५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी वसाहत उभी केली आहे. परंतु योग्य देखभाल न केल्यामुळे वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या परिसरात साफसफाई केली जात आहे. परंतु कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उघड्या गटारांमुळे व साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. सांडपाण्यासाठीच्या गटारावर व सेप्टिक टँकवर झाकणे नसल्याने तेथेही डासांची उत्पत्ती होत आहे. मोडकळीस आलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कचरा टाकला जात आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिव्हरेज लाइनमधील मल व पाणी परिसरात पसरत आहे. इमारतीजवळून जाताना नाक मुठीत धरावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने येथील देखभाल व दुरुस्ती व साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वर्षभर वारंवार डेंग्यू, मलेरियाची साथ पसरत आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरामध्ये तापाचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांना वर्षभर सातत्याने वेगवेगळे आजार होत आहेत. कॉलनीमधील कचऱ्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, त्याचबरोबर परिसरातील सिडको नोडवासीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वारंवार साथ पसरू लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. रेल्वेने या ठिकाणी वसाहत उभी केल्यानंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २० बेड क्षमतेचे स्वतंत्र रुग्णालय बांधले आहे. ५ जानेवारी १९९८ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाप्रबंधक श्री. के. बालाकेसरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु काही दिवसांमध्येच हे रुग्णालय बंद करण्यात आले. सद्य:स्थितीमध्ये कधी तरी एक डॉक्टर या ठिकाणी येत असतात. डॉक्टर कधी येतात व कधी जातात, हेही रहिवाशांना कळत नाही. आंतररुग्ण विभाग बंदच आहे. फक्त दाखविण्यासाठी काही बेड ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना सर्दी, डोकेदुखी व इतर किरकोळ आजारांवरच उपचार होत असतात. डॉक्टर येण्याची वाट पाहण्यापेक्षा कर्मचारी खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. १ एप्रिलला रेल्वे वसाहतीमध्ये सेप्टिक टँकमध्ये पडल्याने महिलेचा पाय मोडला. सदर महिलेवर प्राथमिक उपचार करण्याचीही सुविधा नव्हती. रुग्णालय सुरूच करायचे नव्हते तर इमारत बांधण्यावर लाखो रुपये खर्च का केले, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.