शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

विकास आराखड्यावरील १५८९० हरकतींवर सुनावणी सुरू

By नामदेव मोरे | Published: March 14, 2023 6:06 PM

नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१८ ते २०३८ पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यावर नागरिकांनी दाखल केलेल्या १५८९० सूचना व हरकतींवर मंगळवारपासून प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली आहे. २९ मार्चपर्यंत सुनावणी सुरू राहणार असून प्रत्येक हरकतदारांना सुनावणीसाठी कधी उपस्थित रहावे यासाठीचे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१८ ते २०३८ पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ मध्ये सूचना व हरकती मागविल्या होत्या. नागरिकांनी १५८९० हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती तयार केली आहे. या समितीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक सुधाकर नांगणुरे, सेवानिवृत्त सहसंचालक प्रकाश भुकटे, वास्तुविशारद तथा पर्यावरण तज्ञ निता पाकधने, अभियंता तथा व्हिजेटीआयचे विभाग प्रमुख केशव सांगळे यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्यालयामध्ये सुनावणी सुरू झाली. यावेळी मनपाच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी सुनावणी कशी होणार याविषयी माहिती दिली.

नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर त्यांचे म्हणने २९ मार्चपर्यंत ऐकूण घेतले जाणार आहे. सर्व तक्रारदारांना वेळापत्रक पाठविण्यात आले असून त्या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.अनेक हरकती बोगस

विकास आराखड्यावर शेवटच्या टप्यात अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या. यामधील अनेक नागरिकांना त्यांनी हरकत दाखल केली आहे याविषयी माहितीच नाही. पहिल्याच दिवशी टाटा नगर झोपडपट्टीमधून आलेल्या नागरिकांनी आम्हाला घर मिळणार असल्यामुळे आम्ही आलो असल्याचे सांगितले. यामुळे सुनावणीदरम्यान अनेक हरकती बोगस व तथ्यहिन निघण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई