शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाच वर्षांत ३६० दुर्मिळ सागरी प्राण्यांना मच्छीमारांनी दिले जीवनदान, कासव, व्हेलशार्क, डॉल्फिन, बुलियाचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 7:29 PM

भारत हा एक जैवविविधता संपन्न देश आहे.  जगातील १७ जैवविविधता समृद्ध मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

मधुकर ठाकूर -

उरण : मागील पाच वर्षांत राज्यातील मच्छीमारांनी ३६० दुर्मिळ  सागरी प्राण्यांना जीवनदान दिले आहे.या एकूण ३६० नोंदवल्या गेलेल्या प्रकरणात  मच्छीमारांना एकूण रु. ५४,००,५५०/- (चौपन्न लाख  पाचशे पन्नास) इतके नुकसान भरपाई अदा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मॅन्ग्रोज फाऊंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.मानस मांजरेकर यांनी दिली. 

भारत हा एक जैवविविधता संपन्न देश आहे.  जगातील १७ जैवविविधता समृद्ध मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतातील धोकाग्रस्त वन्यजीवांना व वनस्पतींना भारतीय वन्यजीव संरक्षण दिले गेले आहे, या वन्यजीवांमध्ये अनेक दुर्मिळ सागरी प्राण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रामध्ये सागरी प्राण्यांच्या अगदी सुक्ष्मजीवांपासून ते महाकाय देव माशापर्यंत अशा अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. 

यापैकी काही प्राण्यांच्या प्रजाती जसे समुद्री सस्तन प्राणी (डॉल्फिन, व्हेल), शार्क माशांच्या काही प्रजाती, सागरी कासवे यांना भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या परिशिष्ट १ अंतर्गत सर्वोच्च संरक्षण दिले गेले आहे. समुद्रात मासेमारी करीत असताना ब-याचवेळा संरक्षित सागरी प्रजाती चुकून मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. मच्छीमारांनी तातडीने जाळे कापले तरच हे प्राणी वाचू शकतात. बहुतांशत: मच्छीमार त्यांचे जाळे कापून अशा प्राण्यांना समुद्रात सोडतात. परंतू मासेमारीचे जाळे कापल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. मच्छीमारांच्या अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कांदळवन कक्ष, वन विभाग आणि राज्य मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तपणे मासेमारांकरिता नुकसान भरपाई योजना राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ पासून सुरु केली आहे. 

मासेमारीचे काम करत असताना मच्छीमारांच्या जाळ्यात चुकून अडकलेल्या संरक्षित प्राण्यांना मासेमारी जाळे कापनू त्याची सुटका केल्यास त्यांना मासेमारी जाळ्याच्या नुकसानीच्या भरपाई करीता प्रजातीनुसार कांदळवन कक्ष,वन विभाग यांच्यावतीने  १२०० ते २५,००० रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.

या  २०२२-२०२३ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीसच राज्यभरातून एकूण ५३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.  त्यातून ५२ मच्छीमारांना संरक्षित प्रजाती मासेमारी जाळ्यातून सुखरूप सोडण्यासाठी कांदळवन कक्षामार्फत एकूण रु. ६,५२,५००/- (सहा लाख बावन्न हजार पाचशे) एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली असल्याची माहिती मॅन्ग्रोज फाऊंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.मानस मांजरेकर यांनी दिली. 

 २०१८ पासून राज्यातून दुर्मिळ सागरी प्राण्यांची एकूण ३६० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या ३६० प्रकरणात मच्छीमारांना एकूण ५४,००,५५०/- रुपये (चौपन्न लाख  पाचशे पन्नास)  नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे.यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक (३९) प्रकरणे कांदळवन कक्षाकडे प्राप्त झाली होती. त्यापाठोपाठ रत्नागिरी (६), रायगड (६) व मुंबई (१) या जिल्ह्यांचाही समावेश आहे. या प्रकरणांमध्ये २३ ऑलीव रिडले कासवे, २३ ग्रीन-सी कासवे, ५ हॉक्सबबल कासवे आणि १ लेदरबकॅ समुद्री कासव या दुर्मिळ प्रजातींना मच्छीमारांनी जीवनदान दिले आहे.

जीवनदान प्रजातीचे नाव         संख्या       भरपाईची रक्कम

१)ऑलीव रिडले कासव.              १९७.          २५४१७५०/-२)ग्रीन-सी कासव.                       १०४.           १५३२३००/-३)हॉक्सबिल कासव.                    ०९.             १३६८००/-४)लेदरबॅक (समुद्री कासव).        ०३.              ७५०००/-५)बहिरी मासा (व्हेल शार्क)         ३९.             ९०४७००/-६) लांजा (जांइंट गिटार फिश)     ०६.               ८५०००/-७) गादा (हंप बॅक डॉल्फिन).      ०१.                २५०००/-७) बुलिया (फिनलेस पोर्पोईल).   ०४.              १०००००/-    एकूण                                -    ३६०          ५४,००,५५०/- 

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई