शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती; सामाजिक संस्थांकडून तीन ठिकाणी निर्माल्यावर प्रक्रिया

By नामदेव मोरे | Published: September 12, 2022 6:25 PM

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे. 

मुंबई : गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले होते. विसर्जन तलावांवर निर्माल्य संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली केली होती. दहा दिवसामध्ये ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले असून त्यामधून तुर्भेमध्ये खतनिर्मीती केली जाणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीन ठिकाणी खतनिर्मीती करण्यात येणार आहे.

विसर्जनाच्यावेळी निर्माल्य तलावांमध्ये टाकून जलप्रदुषण केले जाऊ नये यासाठी महानगरपालिकेने काटेकोरपणे उपाययोजना केल्या होत्या. २२ नैसर्गिक तलाव व १३४ कृत्रीम तलावांवर ओले व सुके निर्माल्य संकलीत करण्यासाठी व्यवस्था केली होती. संपूर्ण शहरात निर्माल्य वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती. शहरात दिड दिवसाच्या विसर्जनाच्यादिवशी ६ टन, पाचव्या दिवशी ५.६९ टन, गौरी विसर्जनाच्या दिवशी १२.५७ टन, सातव्या दिवशी ४.५७ टन व दहाव्या दिवशी ९.८८ टन असे एकूण ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. यामध्ये फुले, दुर्वा, पुष्पमाळा, शमी, फळांच्या साली यांचा समावेश आहे. तुर्भे येथील मनपाच्या कचराभुमीवर त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मीती केली जाणार आहे. 

कृत्रीम तलावांना नागरिकांचा चांगला प्रतिसादशहरातील उद्याने व इतर ठिकाणी या खताचा उपयोग केला जाणार आहे. याशिवाय अंकुर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिंचोली व करावे तलाव, नानासाहेब धर्माधीकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरखैरणे येथे निर्माल्यातून कचरा निर्मीती केली जात आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावांनाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. या तलावांमध्ये १५ हजार पेक्षा जास्त श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी संकलीत झालेली फळे व इतर प्रसादांंचे निराधार, गरजू नागरिकांना वितरण करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव