शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 08:19 IST

Navi Mumbai Crime News: पत्नी व वडिलांचा अपमान होत असल्याच्या रागातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. मोरबे गाव परिसरात एक मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी माग काढत उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे.

नवी मुंबई - पत्नी व वडिलांचा अपमान होत असल्याच्या रागातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. मोरबे गाव परिसरात एक मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी माग काढत उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे.

वावंजे येथून बेपत्ता झालेले याकूब खान (६०) यांचा मोरबे गाव परिसरात २९ ऑक्टोबरला मृतदेह आढळला होता. दोन दिवस अगोदर ते हरवल्याची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. याकूब यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक उमेश गवळी यांनी सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, अजित कानगुडे, मानसिंग पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, सागर रसाळ, रूपेश पाटील आदींचे तपास पथक तयार केले. याकूब बेपत्ता झाले तेव्हापासूनचा मागोवा घेतला असता ते श्रीकांत तिवारी याच्यासोबत गेले असल्याचे समोर आले. तिवारी देखील घरी परत आलेला नसल्यामुळे उत्तर प्रदेशमधील त्याच्या मूळ गावी जाऊन पोलिसांनी पाळत ठेवली. मंगळवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

अशी केली हत्या- याकूब व श्रीकांत हे शेजारी असून, याकूब हा श्रीकांतची पत्नी व वडिलांचा सतत अपमान करायचा. यावरून त्याने याकूबला समज देखील दिली होती. त्यानंतरही तो कुटुंबाला अपमानित करत असल्याचा राग श्रीकांतच्या डोक्यात होता. २६ ऑक्टोबरला श्रीकांत हा याकूबला जमिनीच्या व्यवहाराच्या बहाण्याने मोरबे गावाकडे घेऊन गेला.- त्या ठिकाणी झालेल्या वादात श्रीकांतने त्याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. यानंतर मृतदेह शेततळ्यात टाकून त्याने पळ काढला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई