शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

धुवाधार पावसाने कळंबोली वसाहत जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:54 IST

पनवेल परिसरात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

कळंबोली : पनवेल परिसरात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. कळंबोलीतील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनले होते.पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र बुधवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावली. बहात्तर तासानंतही पावसाचे जोर कायम राहील्यानेसखल भागात गुडख्या इतके पाणी साचल शनिवारी सकाळी सुध्दा जोर कमी झाला नव्हता. त्यामुळे परिसरातील चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.कळंबोलीत नालेसफाई व्यवस्थीत न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. पाणी रस्त्यावर दीड ते दोन फुट साचले होते. करवली नाका, सुधागड शाळा, स्टेट बँक, सेंन्ट जोसेफ शाळा समोरील रस्ता पाण्याखाली गेला होता. सेक्टर ४, ५, ८,१०, १४ पाणीच पाणी झाले होते. स्टेट बँक ते मंगलेश्वरी माता मंदीर दरम्यानचा रस्ता पाण्यात बुडून गेला होता. बँक आँफ इंडियासमोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यात दोन तीन दुचाकी बंद पडल्या. स्मृती उद्यानाजवळही पाणी साचले होते. सेक्टर ६ येथील न्यु इंग्लिश स्कूल समोरील उद्यानात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महानगर गॅस पंपाच्या समांतर पनवेल-सायन महामार्गावरील पाणी जाण्याकरीता मार्ग नसल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक सकाळी खोळंबली होती. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा लांबच लांब लागल्या होत्या.महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावरपनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत शनिवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार अधिकारी तसेच कर्मचारी रस्त्यावर उतरले. नवीन पनवेल सेक्टर १३ , ओएनजीसी रेल्वे पुलाखाली, कोळीवाडा, करंजाडे पुलालगत, वेलकम हॉटेल त्याचबरोबर जिथे जिथे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे तिथे तिथे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रहिवाशांच्या मदतीला धावले.नवीन पनवेलही पाण्यातगेल्या चार दिवसापासून पाऊस पडत असल्याने नवीन पनवेल सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली. सेक्टर १३ मध्ये संपूर्ण रस्त्यावर गुढगाभर पाणी साचले आहे. पदपथ सुध्दा पाण्याखाली गेला आहे. वाहनासाठी हा रस्ता महानगरपालिकेने सकाळपासूनच बंद केला आहे. त्याचबरोबर ए टाईप मध्येही घरात पाणी शिरले होते. सेक्टर १७ मधील ही परिस्थिती वेगळी नाही .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई