शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरींना लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:54 AM

दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात

मयूर तांबडे पनवेल : दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील गाव, पाड्यांमध्ये शेकडो विंधण विहिरी खोदल्या गेल्या आहेत. २०१२ ते १७ या पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरी यशस्वी तर २२१ अयशस्वी झाल्या आहेत.एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. शासकीय पातळीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरी देखील पाणीटंचाई कमी होत नसल्याचे दिसत आहे. गाव, आदिवासी वाडे, पाडे आदी ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे २०० फुटांवर खोदण्यात येणाऱ्या विंधण विहिरी अयशस्वी होत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत विंधण विहिरी मंजूर केल्या जातात. या विंधण विहिरी मारण्यासाठी २०० फुटांची मर्यादा असते. मात्र, पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने यातील काही विंधण विहिरींना पाणी लागत नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची होते.मार्च महिना उजाडला की जिल्ह्यातील काही गावे, पाडे यामध्ये पाणीटंचाई जाणवते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरवले पाहिजे. जेणेकरून भविष्यात पुरेसा पाणीसाठा जमिनीत होईल व त्याचा टंचाईकाळात लाभ होईल. काही गावांमध्ये मार्चपासूनच पाण्याचा खडखडाट होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.