शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

कर्जत रेल्वे स्थानकातील काढलेले पत्रे बसविले

By admin | Published: January 30, 2017 2:08 AM

येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत

कर्जत : येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत न बसविल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना पावसाचे फटके आणि उन्हाळ्यात उन्हाचे चटके खात उभे राहावे लागत असे. याबाबत रेल्वे प्रश्नाविषयी गेली कित्येक वर्षे सातत्याने आवाज उठवणारे, तसेच एखादा विषय हाती घेतल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी प्रसिध्द असलेले व सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी याबाबतीत कर्जत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. काम पूर्ण न केल्यास कर्जत रेल्वे स्थानकात धरणे किंवा रेल्वे रोकोसारखे प्रकार करावे लागतील, असे ओसवाल यांनी कर्जत रेल्वे प्रशासनास कळविले होते.ओसवाल यांनी निवेदनाची प्रत कर्जत येथील जीआरपी व आरपीएफ यांना सुद्धा दिली असल्याने व पंकज ओसवाल यांच्या पत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील जीआरपीने त्वरित पंकज ओसवाल यांच्याशी संपर्कसाधून ओसवाल यांना विनंती करून तातडीने कर्जत रेल्वे स्थानकाच्या जीआरपीच्या केबिनमध्ये २९ आॅगस्ट २०१६ ला बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला कर्जत रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर, जीआरपी,आरपीएफचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी पत्रे बसविण्यासाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागेल असे पंकज ओसवाल यांना सांगण्यात आले. या बैठकीत बरीच चर्चा झाल्यानंतर पंकज ओसवाल यांनी तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते तुम्ही मला लेखी कळवा असाच आग्रह धरला होता व तसे न केल्यास आपण आपल्या परीने निर्णय घेऊ व त्याची पूर्णपणे जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच राहील असे लेखी स्वरूपात पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास दिले होते.एक महिना उलटून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबतीत काहीच हालचाल करीत नसल्याने पुन्हा पंकज ओसवाल यांनी सर्वांना स्मरण पत्र पाठविले असताना सुद्धा या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने ओसवाल यांनी शेवटी याबाबतीत झालेल्या सर्वच प्रकाराची माहिती कागदपत्रांसह दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाकडे सादर केली. नंतर मुंबई येथील डीआरएमच्या कार्यालयातून पंकज ओसवाल यांना पत्र पाठविले असून तुमच्या मागणीची त्वरित दखल घेऊ व तुम्ही रेल्वे रोको वगैरे असे करू नका अशी विनंती या पत्रात केली आहे. पंकज ओसवाल यांना मुंबईच्या कार्यालयातून पत्र मिळाल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीतच फलाट क्रमांक एकवर पत्रे बसविण्यात आले आहेत. (वार्ताहर)