शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
2
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
3
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
4
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
5
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
6
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
7
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
8
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
9
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
10
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
11
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
12
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
13
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
14
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
15
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
16
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
17
Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Photoshoot: दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
18
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
19
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
20
Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्...

जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

By admin | Published: February 14, 2017 4:27 AM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार केवळ विजयी उमेदवारालाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. कोकण परिक्षेत्रात देखील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना यंदा अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याच्या प्रक्रियेतून सुटका मिळालेली आहे. यामुळे इच्छुक उमेदवार जितके सुखावले आहेत, तितकाच आनंद जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज सादर करतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागत होते. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे शेकडो अर्ज दाखल व्हायचे. हे सर्व अर्ज अवघ्या १० ते १५ दिवसांत निकाली काढण्याच्या कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडायचा. यामध्ये त्रुटी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज देखील निश्चित मुदतीत काढण्याचे काम करावे लागायचे.परंतु यंदा प्रथमच झालेल्या शासन निर्णयाने उमेदवारांइतकाच जात पडताळणी कार्यालयातील कर्मचारी देखील सुखावला आहे. गत महिन्यात झालेल्या शासन निर्णयानुसार निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारालाच सहा महिन्यापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील निवडणूक काळातला कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. हेच चित्र कोकण भवन येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात पहायला मिळत आहे. एरवी निवडणूक काळात नेहमी गजबजलेल्या या कार्यालय आवारातला गर्दीचा ओस घटला आहे. शिवाय निवडणूक काळात या कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त होत असत. यंदा मात्र त्यात घट होवून रायगडमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघे ३४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी फक्त विजयी उमेदवारांचेच अर्ज निकाली काढले जाणार आहेत. ही प्रक्रिया देखील निकालानंतर सुरू होणार आहे. विजयी उमेदवाराने निकालाचे प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयाकडे सादर केल्यानंतरच या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जांपेक्षा निवडणुकीसाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांची दमछाक व्हायची. अल्प कालावधीत हे अर्ज निकाली काढावे लागायचे.