शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर

By नामदेव मोरे | Published: May 08, 2024 8:06 PM

कोकणसह दक्षिणेतील आंब्याचाही समावेश

नवी मुंबई : अक्षयतृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यातून ५३ हजार पेट्यांची आवक झाली असून बाजारभावही नियंत्रणात आले आहेत.

आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्व असते. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होती व अक्षय तृतीयेला आवकचा विक्रम होत असतो. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी १ लाख १३ हजार व बुधवारी १ लाख १ हजार पेटी आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७३०३ पेटी हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. दक्षीणेतील राज्यांमधून ५३८४२ पेटी आंबा विक्रीसाठी आला आहे.

बाजार समितीमध्ये हापूस ३०० ते ५०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते १ हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. कर्नाटकमधील आंब्याला प्रतीकिलो १०० ते ११० रुपये भाव मिळत आहे. कोकणच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आला असल्यामुळे आता इतर राज्यातील आंब्याची आवक वाढू लागली आहे. मे अखेरीस गुजरातचा आंबा येणारहापूसची आवक यापुढे कमी होईल. मे अखेरीस गुजरातचा आंबा दाखल होईल. जुनच्या पहिल्या टप्यात जुन्नरचा आंबाही मार्केटमध्ये विक्रिसाठी येईल. यानंतर उत्तरप्रदेश व इतर ठिकाणचा आंबाही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

अक्षयतृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षीणेकडील राज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात आहेत. मे अखेरीस गुजरात व जुनमध्ये जुन्नरच्या हापूसची आवक होईल. - बाळासाहेब बेंडे, व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबा