शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

ढगाळ वातावरणामुळे आंबा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2016 2:08 AM

कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे

दासगाव : कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे, कमी प्रमाणात लागणे तसेच हवामानामध्ये वेळोवेळी बदल होत कोरडे ढगाळ वातावरण तयार होणे या कारणामुळे ही सर्व पिके धोक्यात येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लागली होती. परंतु या पावसाचा कडधान्य पिकावर काही परिणाम झाला नसून उलट चांगले पीक मिळाले. नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे मे महिन्यात मिळणारे आंबा पीक सध्या दोन दिवस पडलेल्या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. कोकणात आंबा पीक घेणारे जवळपास ४० टक्के शेतकरी आहेत. यांचा व्यवसाय एकच आंबा पीक. वर्षभर झाडांची मशागत करायची व मे महिन्यात येणारा आंबा चांगल्या पध्दतीने काढून बाजारात विक्री करून पैसा मिळून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र फेब्रुवारीमध्ये महाड तालुक्यात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी आंबा मोहोर येण्यास सुरुवात असल्याने यावर काही परिणाम झाला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत मे महिन्यात विक्रीसाठी मिळणारा आंबा आता जवळपास तीस ते चाळीस टक्के तयार होणार असताना अचानक ढगाळ व कोरडे वातावरण झाल्यामुळे या तयार झालेल्या आंब्याला गळती लागली असल्यामुळे मिळणारे पीक कमी प्रमाणात मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात अवेळी आंबा दिसत असला तरी तो औषधांची फवारणी करून पिकवण्यात येतो. मात्र मे, जून महिन्यातील येणारा आंबा या नैसर्गिकरीत्या पिकलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड पडण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या हवामानाच्या बदलामुळे गेले दोन दिवसांत महाड तालुक्यातील बहुतेक ठिकाणी आंब्याला गळती सुरू झाली आहे. या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी या पिकांसाठी व वर्षभराच्या मशागतीसाठी कर्ज घेऊन ही कामे करतात. मात्र या ढगाळ कोरड्या वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या समोर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न पडला आहे, तरी आंबा पिकाच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून करण्यात यावे व याची भरपाई मिळावी, अशी मागणी गरीब शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)