शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची नामुष्की

By admin | Published: June 28, 2017 3:35 AM

महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरोलीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.