शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

By नामदेव मोरे | Updated: September 20, 2024 05:36 IST

या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

नामदेव मोरे

नवी मुंबई : ‘फळांच्या राजा’चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. मुंबईकरांनी तब्बल १ लाख २४ हजार ३८ टन आंबा फस्त केला असून, यातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या नियमित हंगामापूर्वी ६ नोव्हेंबरला कोकणातून हापूसची पहिली पेटी दाखल झाली होती. यानंतर काही दिवसांमध्ये मलावी हापूसचीही आवक सुरू झाली होती. पहिली पेटी लवकर आली असली तरी नियमित आंब्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. २०२३ मध्ये फेब्रुवारीमध्ये १८०८ टन आवक झाली होती. २०२४ मध्ये ती २५६६ टनांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ३८ हजार ७७८ टन आवक झाली होती. ग्राहकांना ऑगस्टअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता.

मुंबई बाजार समितीमध्ये हंगामामध्ये १ लाख २४ हजार ३८ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये  कोकणसह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. हापूस, पायरी, बदामी, लालबाग, चौसा व इतर सर्व प्रकारचा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील ग्राहकांसह येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही करण्यात आली.

या वर्षी हंगाम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होता. यामुळे ग्राहकांना आंब्याचा आस्वाद घेता आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मलावीमधील आंबा ग्राहकांना उपलब्ध होईल.

               - संजय पानसरे,   संचालक, फळ मार्केट

आंबा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. वाहतूककोंडी व इतर समस्या होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. हंगाम उत्तम पद्धतीने पार पडला.

- संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट