शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

By नामदेव मोरे | Published: September 20, 2024 5:36 AM

या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

नामदेव मोरे

नवी मुंबई : ‘फळांच्या राजा’चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. मुंबईकरांनी तब्बल १ लाख २४ हजार ३८ टन आंबा फस्त केला असून, यातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या नियमित हंगामापूर्वी ६ नोव्हेंबरला कोकणातून हापूसची पहिली पेटी दाखल झाली होती. यानंतर काही दिवसांमध्ये मलावी हापूसचीही आवक सुरू झाली होती. पहिली पेटी लवकर आली असली तरी नियमित आंब्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. २०२३ मध्ये फेब्रुवारीमध्ये १८०८ टन आवक झाली होती. २०२४ मध्ये ती २५६६ टनांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ३८ हजार ७७८ टन आवक झाली होती. ग्राहकांना ऑगस्टअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता.

मुंबई बाजार समितीमध्ये हंगामामध्ये १ लाख २४ हजार ३८ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये  कोकणसह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. हापूस, पायरी, बदामी, लालबाग, चौसा व इतर सर्व प्रकारचा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील ग्राहकांसह येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही करण्यात आली.

या वर्षी हंगाम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होता. यामुळे ग्राहकांना आंब्याचा आस्वाद घेता आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मलावीमधील आंबा ग्राहकांना उपलब्ध होईल.

               - संजय पानसरे,   संचालक, फळ मार्केट

आंबा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. वाहतूककोंडी व इतर समस्या होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. हंगाम उत्तम पद्धतीने पार पडला.

- संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट