शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

नाव मोठे... लक्षण खोटे...

By admin | Published: May 05, 2017 6:17 AM

कामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकामोठे वसाहतीत ११ ते १३ हे तीन प्रभाग आहेत. निवडणुकांमुळे सध्या प्रभागात प्रचाराला वेग आला असला तरी याठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गटार आदी समस्या गंभीर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वसाहतीला या समस्या भेडसावत असल्या तरी याबाबत योग्य उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळेच नाव मोठे नि लक्षण खोटे अशी स्थिती वरील तीनही प्रभागात दिसून येते. सिडकोने या वसाहतीबाबत कायम दुजाभाव केला आहे. महापालिका झाल्याने आतातरी समस्या सुटतील अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना स्थानिकांच्या अपेक्षा पूर्तीकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एका बाजूला पनवेल - सायन महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला मानसरोवर व खांदेश्वर रेल्वेस्थानक यामुळे कामोठे वसाहतीला चाकरमान्यांकडून विशेष पसंती दिली जाते. या ठिकाणी घर घेणाऱ्यांबरोबरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटुंब या तीनही प्रभागात स्थायिक झालेले आहेत. या व्यतिरिक्त गुजराती आणि राजस्थानी लोकांची संख्याही मोठी आहे. स्थानिक आगरी, कराडी आणि कोळी समाजाचे लोकही मोठ्या प्रमाणात कामोठे वसाहतीत वास्तव्यास आहेत. वसाहतीतील पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. याचे कारण नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणावर कामोठेकरांना अवलंबून राहावे लागते. मात्र मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी कामोठे वसाहतीत दिवसाआड पाणी दिले जात होते. आता परिस्थिती काहीशी बरी असली तरी इतर वसाहतीप्रमाणे तीनही प्रभागात मुबलक पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांत योग्य देखभाल न झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होते. पावसाळी नाल्यांची साफसफाईही ठेकेदार करीत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथावर अतिक्रमण केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी एनएमएमटी सुरू केली असली तरी फेऱ्या अपुऱ्या आहेत. बायोमेडिकल वेस्ट बिनधास्तपणे मोकळ्या जागेवर टाकले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची समस्या नित्याचीच असून सिडकोकडून औषध फवारणी नियमित केली जात नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकही हैराण झाले आहेत.तीनही प्रभागात बीअर शॉपी, बारची संख्या मोठी आहे. पाचशे मीटर अंतरामुळे काही बार बंद झाले असले तरी त्याठिकाणी चोरून दारू विक्र ी होते. येथील काही बार मालकाने थेट इमारतीची स्टील्ट पार्किंग अडवून तिथे किचन टाकले आहे. याविरोधात रहिवाशांनी पाठपुरावा करूनही त्यांना सिडको, पोलीस यंत्रणा दाद देत नाही.दोन कि.मी.चा वळसाकामोठे वसाहतीलगत पनवेल - सायन महामार्गाचे सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. त्यामुळे रहिवाशांना मुंबईकडे जाण्याकरिता थेट कळंबोलीला वळसा घालावा लागतो. याबाबत वारंवार आंदोलने, तसेच पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही.