शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Navi Mumbai: आर्थिक वादातून तरुणाचे केले अपहरण, पोलिसांनी नागपूरमधून केली तरुणाची सुटका 

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 19, 2024 11:14 PM

Navi Mumbai Crime News: टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई  - टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

डोंबिवलीच्या पलावा येथे राहणाऱ्या आदित्य तिवारी (२२) याचे रविवारी कोपर खैरणेतून अपहरण झाले होते. रविवारी दुपारी तो दोन मित्रांसह कोपर खैरणे सेक्टर ८ येथे टॅटो काढण्यासाठी आला होता. यावेळी अगोदरच तिथे असलेल्या एकाने आदित्य तिवारीला धमकावून कारमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्यानंतर मात्र त्याच्याशी संपर्क न झाल्याने मित्रांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षानेही तपासाला सुरवात केली होती. त्यासाठी सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक हर्षल कदम, श्रीनिवास तुंगेनवार, शशिकांत पवार, उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार निलेश किंद्रे, अनिल यादव, महेश पाटील व सतीश चव्हाण आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्हीद्वारे दोन कारचा नंबर मिळवला होता. त्यानुसार तांत्रिक तपास व कारचा सुगावा घेऊन अपहरणाचा कट रचणाऱ्या दोघानं ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांकडे तिवारी याला डांबून ठेवले होते. मात्र दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच ते तिघेही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक करून अपहरण झालेल्या आदित्य तिवारीची सुटका केली. आदित्य व दोन प्रमुख अपहरणकर्ते यांच्यात जुनी ओळख असून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होते. मार्केटिंग कंपन्यांवरून हा वाद असल्याचे देखील समजते. यातून त्यांनी आदित्यवर पाळत ठेवून अपहरणाचा कट रचला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई