शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा

By योगेश पिंगळे | Updated: May 27, 2024 17:05 IST

यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी जाहीर झाला. नवी मुंबई शहराचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलीच अव्वल ठरल्या आहेत. शहरातील अनेक शाळांनी आपली यशाची परंपरा निकालातून यंदाही कायम राखली आहे. यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

राज्यभरात १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेला शहरातील १४३ शाळांच्या माध्यमातून १५ हजार ६३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील १५ हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा शहरातील तब्बल ५७ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यावर निकालाच्या सर्व वेबसाइट काही वेळ संथगतीने सुरू होत्या. निकाल कळल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांसोबत आनंद व्यक्त केला.

पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६० टक्के....

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला शहरातून ९१० पुन:परीक्षार्थी विद्यार्थी सामोरे गेले होते. यामधील ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६०.८७ टक्के इतका लागला आहे.

समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव....

दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेकांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निकटवर्तीयांचे फोटो, निकालाची प्रत व्हॉट्सॲपच्या स्टेट्सला ठेवले होते.

दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लावला जातो. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच निकाल लावणे हे या निकालाचे वैशिष्ट्य असून, याकामी सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. मुंबई विभागाचा निकाल चांगला लागला असून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा जोमाने चांगला अभ्यास करून जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे, असंडॉ. सुभाष बोरसे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEducationशिक्षण