शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मार्केटच्या पुनर्बांधणीकडे मनपाचे दुर्लक्ष

By admin | Published: November 24, 2015 1:40 AM

मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे.

नवी मुंबई : मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे. अपुरे नियोजन, जागेअभावी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी रस्त्याची अडवणूक केली आहे. या मासळी बाजारात दरदिवशी वेगवेगळ््या भागांतील नागरिक मासे खरेदीसाठी येतात. मात्र या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच गाड्या उभ्या करून मासे खरेदी केली जाते. त्यामुळे येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात आणि विक्रेत्यांनी पदपथावरील जागा अडवल्याने येथे चालणेही मुश्कील होत आहे. नवी मुंबर्ई पालिकेने या मासळी बाजाराच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत आहेत. या ठिकाणी वेळोवेळी साफसफाई न केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून, त्या ठिकाणी असलेले नादुरुस्त पंखे, विक्रेत्यांना टोपल्या ठेवण्यासाठी जागा नसल्याने मासळी बाजारात जागेचा प्रश्न उद्भवत आहे. मासे विक्रेत्यांना जागेचे अचूक वाटप न करून दिल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत असून, नवीन विक्रेत्यांना मात्र या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. या मासळी बाजारात प्रत्येक विक्रेत्याला तीन फुटाच्या अंतरावर एक भिंत बांधून जागा उपल्बध करून दिली, तर जागेअभावी बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे होणारी रस्त्याची अडवणूक थांबविता येईल, असे मत येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले; तर सर्व सोयीसुविधांयुक्त तसेच मोठी जागा असलेले मासळी बाजार प्रशासनाने उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी केली. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांनी या मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीची मागणी केली असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून लाभार्थींना या ठिकाणी जागेचे वाटप केले जाणार असून, पुनर्बांधणीचा प्रस्तावही लवकर मार्गी लावण्यात येईल.