शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

एनएमएमटीची आता रिंग रूट सेवा

By admin | Published: August 18, 2015 3:05 AM

केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे

नवी मुंबई: केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात वसाहती आणि स्थानकांना जोडण्यासाठी रिंग रूट सेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तोट्यात चाललेल्या एनएनएमटीचा कारभार पूर्वपदावर आणण्यात व्यवस्थापनाला काही प्रमाणात यश आले आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या वातानुकूलित व साध्या ३०१ बसेस आहेत. या बसेस नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, पनवेल आदी भागांतील ४७ मार्गांवर धावतात. परंतु यातील लांब पल्ल्याचे अनेक मार्ग तोट्यात असल्याने व्यवस्थापन हे मार्ग बंद करण्याच्या विचारात आहे. त्याला पर्याय म्हणून शहरातील वसाहतींना व स्थानकांना जोडणारे छोटे मार्ग अर्थात रिंग रूट सुरू करण्याची उपक्रमाची योजना आहे. केंद्र शासनाच्या जे.एन.एन.यू.आर.एम.ए. योजनेअंतर्गत परिवहन उपक्रमाला ६० मिडी बसेस मिळणार आहेत. त्यापैकी १० बसेस गेल्या आठवड्यात उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. रिंगरूटवर या मिडी बसेस चालवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)