शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:11 IST

पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी २०२५-२६ वर्षासाठीचा ५,७०९ कोटी ९४ लाख  रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला.  विक्रमी सलग २१ वर्षे नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ केलेली नाही. पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

नवी मुंबई पालिकेने २००५ पासून मंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार करवाढ न करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही थेट कोणताही कर वाढविलेला नाही. आयुक्त. डॉ. कैलास शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. ‘मेरा शहर, मेरा अभिमान’ या घोषवाक्यासह ‘नई रफ्तार, नये अंदाज से चलता हैं’, ‘नई मुंबई का हर एक आदमी विकास की और चलता हैं’चा शायराना नारा देऊन आयुक्तांनी पुढील वर्षभरात कोणत्या योजनांना प्राधान्य देणार याची माहिती दिली. 

१,३०१ कोटी आरंभीच्या शिलकेमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प ५,७०९ कोटी ९४ लाख रुपये झाला आहे. 

१,७५७कोटी रुपये सर्वाधिक उत्पन्न वस्तू व सेवा कर अनुदानाच्या माध्यमातून मिळणार  आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून १,२०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शासन अनुदानातून ४०५ कोटी रुपये मनपाला मिळणार आहेत. 

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य दिले आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्याकडेही लक्ष दिले आहे.  डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, पालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई