शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

राष्ट्रवादीबरोबरचे जुने हिशेब चुकते

By admin | Published: May 12, 2016 2:23 AM

स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी व नाईक परिवाराबरोबरचे जुने हिशेबही चुकते केले.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी व नाईक परिवाराबरोबरचे जुने हिशेबही चुकते केले. यापूर्वी नाईकांच्या आदेशानंतर कोणत्याही प्रसंगाला भिडणारे एकेकाळचे सहकारी यावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचे रान करत होते. नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांचे जवळपास तीन दशके वर्चस्व राहिले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून त्यांचे या संस्थेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. विकासाची दिशा, निर्णय व त्यांची अंमलबजावणीमध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा. विकासकामे करून घेण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकही व्हाईट हाऊस, कॉरी व रेतीबंदर कार्यालयामध्ये हजेरी लावत असल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले होते. नाईकांनी जनसंपर्काच्या बळावर स्वत:चे वलय निर्माण केले आहे. राजकीय वाटचालीमध्ये अनेक वेळा पराभवास सामोरे जावे लागले असले तरी सत्तेचे केंद्र तेच राहिले होते. महापौर, स्थायी समितीसह अनेक निवडणुकीमध्ये नाईकांनी संख्याबळ कमी असतानाही विजय मिळविला होता. परंतु स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये संख्याबळ असतानाही पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण या निवडणुकीनिमित्त शिवसेना, भाजपा व काँगे्रसमधील अनेकांनी जुने हिशेब चुकते करण्याचे समाधान मिळविले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही जीवाचे रान केले होते. यापूर्वी अनेक वर्षे चौगुले हे नाईक यांचे निष्ठावंत म्हणूनच ओळखले जात होते. त्यांच्या इशाऱ्यावर अनेक निवडणुकांचे निकाल त्यांनी बदलविले होते. परंतु गणेश नाईक यांच्या पुढील पिढीचे विचार न पटल्याने त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. चौगुले यांच्याप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त धावपळ केली ती एम. के. मढवी यांनी. मढवीसुद्धा यापूर्वी नाईक यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात.अद्याप ते गणेश नाईकच आमचे गॉडफादर असल्याचे जाहीर सांगतात. परंतु आमदार संदीप नाईक यांच्याशी भांडण झाल्याने ते बाहेर पडले. याशिवाय भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रेही अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्येच होत्या. नाईक पक्षामध्ये योग्य सन्मान देत नसल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला. याशिवाय माजी आयुक्त विजय नाहटा हेही नाईक यांच्या कार्यपद्धतीला वैतागले होते. एकेकाळी नाईक यांच्यासोबत काम केलेल्या या पदाधिकाऱ्यांनीच यावेळी त्यांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले होते. नाईकांची कार्यपद्धती व त्यांच्या खेळी जवळून पाहिल्या असल्याने व राजकीय डावपेचांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षात धावपळ करण्याचा अनुभव असल्यानेच स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करणे शक्य झाले आहे. ताईगिरीची ताकदभाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला प्रदेशाध्यक्षा. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून शरद पवार यांनी त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली होती. परंतु नाईक यांनी त्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. निर्णय प्रक्रियेमध्येही कधीच घेतले नाही. यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हापासून नाईकांना कोंडीत पकडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून स्थायी समिती निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थायी समिती सभापती निवडणुकीमधील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. उपमहापौरपद व स्थायी समिती सदस्य व एक विशेष समितीचे सभापतीपद दिल्यानंतरही काँगे्रसने धोका दिला. शिवसेना व भाजपा नेत्यांनी कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. सध्या पालिकेमध्ये सत्ता राष्ट्रवादीची परंतु महापौर अपक्ष, उपमहापौर काँगे्रस व स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे अशी स्थिती आहे. सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या हातातून महत्त्वाची पदे गेली आहेत. अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.