शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

देशात एक लाख परिचारिकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 2:33 AM

आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे.

मुंबई: आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे. देशातील परिचारिकांची संख्या सुमारे १ लाख असून, आरोग्य क्षेत्रात अजूनही १ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या परिचारिकांच्या अभ्यासक्रमाच्या जागांचा विचार केल्यास १ लाख परिचारिका तयार होण्यास तब्बल १० वर्षांचा कालावधी लागेल, असे मत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरवर्षी १६ हजार ५०० परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करतात. हा वेग कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत परिचारिका क्षेत्रात असलेल्या विविध संधींचा विचार होताना दिसत नाही. परिचारिका क्षेत्राविषयी मर्यादित माहिती मिळत असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र, हे सत्य नाही. परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. त्यांनी स्पेशलाइज अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात, असेही माळी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळ यांनीदेखील परिचारिकांची संख्या कमी होत असल्यामुळे परिचारिकांवर पडणाऱ्या ताणाविषयी सांगितले. राज्यातील जिल्हा रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी ‘सिस्टर इन्चार्ज’ हे पद रद्द केले. राज्यातील ७५० पदे रद्द झाली. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेला ‘सिस्टर इन्चार्ज’चे म्हणजे प्रशासकीय कामकाजासह रुग्णसेवा अशी दोन्ही कामे सांभाळावी लागत आहेत. सध्या राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार परिचारिका कार्यरत आहेत. कौन्सिलच्या गुणोत्तरानुसार ९ रुग्णांमागे एक परिचारिका कार्यरत हवी, पण हे गुणोत्तर पूर्ण होत नाही. एका परिचारिकेवर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरदेखील होतो. रुग्णसेवा करताना परिचारिकेना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांच्या औषधांची वेळ सांभाळत त्यांची शुश्रूषा करावी लागते. त्याच इतर कामाकडेही लक्ष द्यावे लागते. या सगळ््या कामाच्या ताणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे वाढवावीत, ती भरली जावीत हे आपले प्रमुख म्हणणे असल्याचे वायकोळ यांनी स्पष्ट केले.