शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पाणथळ जागेवरील प्रस्तावित निवासी संकुलांना विरोध

By कमलाकर कांबळे | Updated: March 3, 2024 20:35 IST

पर्यावरणवाद्यांचे एनआरआयमध्ये वेटलॅण्ड बचाव अभियान

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील एनआरआय स्थित पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या शहराच्या विकास आराखड्यात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. या मुद्यावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी एनआरआय येथील पाणथळ परिसरात एकत्रित येऊन पर्यावरणप्रेमींनी सेव्ह वेटलॅण्डचा नारा दिला.

नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सीटी’ अशी ओळख निर्माण केली जात आहे. नेरुळ-सीवूड परिसरात पाम बीच मार्गाच्या खाडीकडील बाजूस असलेल्या पाणथळींच्या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात. पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी ही ठिकाणे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. असे असतानाही महापालिकेने विकास आराखड्यात पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलासाठी खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडल्याने पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पर्यावरण बचाव समितीचे सुनील अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सीवूडस येथील पाणथळ जागेवर रविवारी सेव्ह वेटलॅण्ड अभियान राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. विशेष म्हणजे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान, पाणथळींच्या जमिनीवर प्रस्तावित निवासी संकुलाचा प्रस्ताव जोपर्यंत विकास आराखड्यातून काढून टाकला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी, भारत भूषण गुप्ता, अमिताभ सिंग, अभय वाळुंज आदींनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई