शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

By नामदेव मोरे | Published: September 25, 2024 5:01 PM

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन :समाजात दुफळी निर्माण होणे राज्याला भुषणावह नसल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भुषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजीत मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा समाजाची चळवळ अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे उभी राहिली. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. मराठा समाजाच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. आता वेगवेगळ्या आरक्षणाची मागणी होत आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घ्यायचा व तो न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरफट होईल. मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे राहणे राज्यासाठी भूषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट आहे. सारथीच्या माध्यमातून युपीएससी व एमपीएससीमध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक घडविले असल्याचेही स्पष्ट केले.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. नाशिकमधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसामध्ये बैठक आयोजीत केली जाईल. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माथाडी कामगारांच्या नावाने चुकीचे काम करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कोणताही कायदा सरकार करणार नाही. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी यावेळी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मेळाव्यास आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे नामकरण करणार.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न मार्गी लावणार.

नाशिक येथील माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसात बैठक बोलावणार.

नवी मुंबईतील गृहप्रकल्पात कामगारांना प्राधान्य देण्याविषयी प्रयत्न करणार.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविले, ८४०० कोटीचे कर्जवाटप.

सारथीच्या माध्यमातून १२ आयएएस, १८ आयपीएस व एमपीएसीमध्ये ४८० उमेदवार यशस्त्री झाले.

मराठा समाजासाठी होस्टेलची सुविधा, होस्टेल न मिळणारांना ७ हजार रुपये निर्वाह भत्ता.

माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांचा बंदोबस्त करणार.

माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कायदा करणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस