शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:04 IST

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक

मधुकर ठाकूर

उरण : उरणातील नामांकित युईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्थापनाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (१४) संतप्त झालेल्या पालक-शिक्षक संघटनेने जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात मागील अनेक वर्षांपासून पालक-शिक्षक संघटनेचा संघर्ष सुरू आहे.

नुकतेच पालक-शिक्षक संघटनेला अंधारात ठेवून विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या वादग्रस्त निर्णयावर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वादळी चर्चा झाली. चर्चेत ओळखपत्रासाठी करण्यात येत असलेल्या भरमसाठ फी आकारणी विरोधात संतप्त झालेल्या संघटना आणि पालकांनी धारेवर धरत व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे व्यवस्थापनाने बैठकीतुनच काढता पाय घेतला.

व्यवस्थापनाचा पळपुटेपणा पालक संघटनेला भावला नसल्याने सोमवारी (१४) शाळेच्या आवारातच उत्स्फूर्तपणे जमलेल्या पालक-शिक्षक संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकांनी व्यवस्थापना विरोधात जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी युईएस व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचून उरण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. गटशिक्षण अधिकारी  प्रियांका पाटील यांनीही तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांच्याशीही शाळेच्या मनमानी कारभाराबाबत चर्चा केली असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.

युईएस शाळा व्यवस्थापनाचा मनमानी कारभाराचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.सातत्याने केली जाणारी भरमसाठ फी वाढ विद्यार्थी- पालक वर्गासाठी चिंतेची बाब ठरते आहेच.त्याशिवाय वाढविण्यात आलेली फी पालकांकडून सक्तीने वसूल केली जात आहे.त्यातच आता कहर की काय वसुल करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या फी मधुन ओळखपत्रासाठी आवश्यक फी याआधीच वसुल करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत.

शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे मात्र विद्यार्थी,पालकांचे नाहक आर्थिक शोषण केले जात आहे.मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण ठरू लागले आहे.त्याचा नकळतपणे विपरीत परिणाम पालक, विद्यार्थ्यांवर होत आहे.शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात याआधी पासुनच संघर्ष सुरू आहे. यापुढेही संघर्ष कायम सुरू राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक-शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्रतिभा भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

मुले शाळेत येताना आणि शाळा सुटल्यावर बाहेर जाताना पालकांना माहिती देणारी  तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रणेपोटीच फी आकारणी केली जात आहे.६५ टक्के पालकांनी तर फी अदाही केली आहे.मात्र शाळेची नाहक बदनामी करण्याच्या कटकारस्थानामागे काही राजकीय संघटना कार्यरत आहेत.शाळा व्यवस्थापनाचे कामकाज नियमानुसार सुरू आहे.अशी प्रतिक्रिया युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाuran-acउरण